जळगाव : राज्यात पक्ष फुट प्रकरणानंतर राजकीय वातावरणाचं समीकरण पुर्णपणे बदलून गेलं. सुरूवातीला भाजप विरूद्ध महाविकास आघाडी असा सामना होणार अशी चर्चा असतांना पक्ष फुटी प्रकरणानंतर राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा राजकीय संघर्ष सुरू झाला. यावरून आता आगामी निवडणुकीत आमच्याच जास्त जागा जिंकून येतील असा दावा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं विधान केलं आहे.
हेही वाचा…“राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं?” निवडणुक आयोगात सवाल, अजित पवार गटाने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
माझ्या नशिबात असेल तर आगामी निवडणूकीत चारी मुंड्या चित करून मी भगवा झेंडा घेऊन येईन. नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईन. असं गुलाबराव पाटलांन म्हटलंय. जळगावातील पाळधी इथल्या भजनी मंडळांना साहित्य वाटप कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटील यांनी जाहीर भाषणात फटकेबाजी करतांना विधान केलंय.
हेही वाचा…कार्यक्रमात तरुणीवर पैसे उधळणे अजित पवार गटाच्या सभापतीला भोवलं, सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
दरम्यान, आगामी निवडणुका या महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशा लढविल्या जाण्याची शक्यता आहे. यातच पक्ष फुट प्रकरणानंतर बंडखोर आमदारांना निवडणुकीची मोठी भिती मनात भरलेली दिसून येत आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जनता कोणच्या बाजून कौल टाकणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.?
READ ALSO :
हेही वाचा…“दादासमोर नाक उचलून ,धाकुटी विचारे, तू कुठं काय केलंस?”, रूपाली चाकरणकरांनी सुप्रिया सुळेंना डिवचलं
“२०० आमदारांचं सरकार असूनही स्थिर नाही,” सुळेंच्या टिकेला अजित पवारांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले..
हेही वाचा…प्रवीण दरेकरांची ‘राज्य सरकार समन्वयक’ म्हणून निवड, ‘मकाऊचा’ उल्लेख करत बावनकुळेंवर रोहित पवारांची टिका
हेही वाचा…ठाण्यात भाजपला मोठा धक्का, ‘या’ माजी महिला शहर अध्यक्षा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार
हेही वाचा…अंतरवाली सराटीत दगडफेकी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पोलिसांनी केली तिघांना अटक