ठाणे : दिव्यातील तीव्र पाणी टंचाईवर आक्रमकपणे भूमिका घेत महापालिका मुख्यालयावर पाणी हक्क आंदोलनाद्वारे धडक देणाऱ्या व दिव्यातील महिलांचे प्रश्न सातत्याने मांडणाऱ्या ज्योती पाटील लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे दिव्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दिव्यातील माजी महिला शहर अध्यक्षा ज्योती पाटील महिलांसाठी सातत्याने आवाज उठवत असतांनाही त्यांना पक्षातून डावलण्यात येत असल्याने भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका
ज्योती पाटील यांना भाजपकडून सातत्याने डावलण्यात येत आहे. २०१७ च्या निवडणुकीत शेवटच्या टप्प्यात त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. त्यांनी अनेक कार्यक्रम राबवून पक्षाची ताकद वाढवली, पण शेवटच्या टप्प्यात त्यांना तिकीट नाकारण्यात आले होते. दिवा भाजपमध्ये दोन मंडल अध्यक्ष पद सोडून गेल्यानंतर ५०० महिलांना सोबत घेऊन आलेल्या ज्योती पाटील यांनी वर्षभर विविध उपक्रम व पक्षाचे काम केल्यानंतरही नव्या कार्यकारिणीत संधी देण्यात आली नाही. यातच दुसऱ्यांदा त्यांना डावलण्यात आल्याने कार्यकर्ते देखील नाराज होते.
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा
दरम्यान, ज्योती पाटील ह्या आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता त्या शेकडो महिलांसह, मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…अंतरवाली सराटीत दगडफेकी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या, पोलिसांनी केली तिघांना अटक
हेही वाचा…“राष्ट्रवादी पक्षासाठी अजित दादांनी काय केलं?” निवडणुक आयोगात सवाल, अजित पवार गटाने दिलं ‘हे’ प्रत्युत्तर
हेही वाचा…कार्यक्रमात तरुणीवर पैसे उधळणे अजित पवार गटाच्या सभापतीला भोवलं, सभापतीसह सात जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार गटाकडून रचला कट, निवडणूक आयोगात जोरदार युक्तिवाद
हेही वाचा…“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे,” जरांगे पाटलांचं भुजबळांना आवाहन