मुंबई : मराठा आरक्षणाबाबत सरकार म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आदरपूर्वक बोलत आहेत. दोन समुहांत अंतर निर्माण होईल आणि एकमेकांपासून दुरावा निर्माण होईल, असे वक्तव्य कुणीही करू नये. विरोधी पक्षातील काही लोकांचे मात्र पोट दुखत आहे, आताच्या आता आरक्षण देण्याची मागणी ते करत आहेत. दोन्ही डाब्यावर हात ठेून ते हसिन सपने पाहत असल्याचा टोला मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लगावला.
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सरकार काम करणारे आणि संवेदनशील असते तेव्हा प्रत्येक समुहाला वाटते की तेथे न्याय मिळेल, जेथे न्यायाची अपेक्षा असते तेथे मागण्यांसाठी आंदोलन करायलाच हवे. महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, त्यामुळे त्यांना जनतेचे आणि विकासाचे प्रश्न महत्वाचे नव्हते. शिंदे-फडणवीस- अजित पवार सरकार प्रत्येक आंदोलनाची दखल घेत गंभीरपणे काम करत आहेत. असंही सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलंय.
हेही वाचा…राजस्थानमध्ये हिंदू ह्यदय सम्राट नावाचा वापर, मोदींची जादू संपली की काय?
दरम्यान, मागील काही दिवसापासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटत आहेत. मराठा , धनगर, ओबीसी आणि इतरही समाजाचे आंदोलन सुरू आहे. सरकार प्रत्येक समाजाबाबतीत संवेदनशील आहे. प्रत्येक आंदोलनाची सरकार दखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देईल, असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते”
हेही वाचा…“खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप”
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी जायकवाडीतून पाणी न सोडण्याचा निर्णय,” अशोक चव्हाणांनी केली मोठी मागणी