नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे आतापर्यंत शरद पवार निर्विवाद अध्यक्ष राहिले असून त्यांच्या अध्यक्षपदावर कोणीही दावा सांगू शकत नाही. अजित पवार गटाचा गंभीर आरोप हा अध्यक्ष पदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा असल्याने त्याने हा कट रचला आहे. असा जोरदार युक्तिवाद शरद पवार गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी आज निवडणुक आयोगात केला. आज राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हाबाबत सुनावणी पार पडली. त्या सुनावणी राष्ट्रवादीचा २०१९ पासूनचा घटनाक्रम देवदत्त कामत यांनी निवडणुक आयोगात सांगितला.
हेही वाचा…“खोटं बोलण्यात आणि गाजर देण्यात जगातील सर्वात मोठा पक्ष म्हणजे भाजप”
२०१९ मध्ये जनतेने राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या आघाडीला मतदान केल्याने राष्ट्रवादीला ५४ जागा तर काॅंग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. यातच अजित पवार यांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार किंवा भूमिका ही नसून त्यांना फक्त पक्षावर ताबा हवा आहे. पक्षात किंवा संघटनेत त्यांच्याकडे कुठलीही जबाबदारी नाही. महाविकास आघाडी सरकार असताना ते फक्त राष्ट्रवादी संसदीय पक्षाचे नेते होते. त्यामुळे पक्षात कोणतीही फुट नसल्याचं देवदत्त कामत यांनी नमुद केले.
अजित पवार गटाचा हा सत्ता मिळण्यासाठीचा प्रयत्न आहे. अजित पवार यांच्याकडे पक्षाची कोणतीही जबाबदारी नव्हती. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाने एकत्र निवडणूक लढवली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला 54 काँग्रेसला 44 जागा मिळाल्या होत्या. सत्तेत सहभागी होण्यासाठी अजित पवार यांनी पक्षावर दावा केलाय.
हेही वाचा…“मराठा आरक्षणासाठी जायकवाडीतून पाणी न सोडण्याचा निर्णय,” अशोक चव्हाणांनी केली मोठी मागणी
अजित पवार गटाला फक्त सत्ता हवी म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. दिल्लीत पार पडलेल्या आठव्या अधिवेशनाच्या दरम्यान शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड करताना प्रस्तावक म्हणून पटेल होते. मात्र आता शरद पवारांच्या अध्यक्ष पदाच्या निवडीला ते बेकायदेशीर संबोधित आहेत. ही सर्व प्रक्रिया निवडणुक अधिकारी टी मास्टर यांच्यासमोर १ सप्टेंबर रोजी करण्यात आली. पितांबर मास्टर हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या निवडणुक कार्यक्रमच्या समितीचे तेव्हा प्रमुख होते. राष्ट्रीय अधिवेशनामध्ये जे पदाधिकारी होते त्यांच्या वतीने एकच नाव प्रस्तावित करण्यात आलं होतं. ते शरद पवार यांचं होतं. त्यावेळी पक्षात कुठलीही दुफळी नव्हती असंही देवदत्त कामत यांनी सांगितले.
हेही वाचा…“गद्दार गट ३१ डिसेंपर्यंतच..” आदित्य ठाकरेंचं सुचक विधान, शिंदे गटाची धाकधुक वाढली
दरम्यान, राष्ट्रवादीच्या घटनेनुसार सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्याच आधारावर अध्यक्षपदासाठी शरद पवारांचं नाव निश्चित करण्यात आलं. अजित पवार यांच्या वतीने जेव्हा दुसरा गट स्थापन करण्यात आला तेव्हा त्यांनी थेट आपलं अध्यक्ष पदासाठी नाव निश्चित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार कुठलीही कारवाई करण्यात आली नाही आणि अध्यक्षपदावर त्यांनी दावा करत स्वतःला अजित पवार यांनी अध्यक्ष म्हणून घोषित केले. हे चुकीचं आहे. शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष व्हावे या प्रस्तावावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांची प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी आहे. त्यानंतर शरद पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केलं. असा युक्तिवाद देखील देवदत्त कामत यांच्याकडून करण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा…“छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासाठी सहकार्य करावे,” जरांगे पाटलांचं भुजबळांना आवाहन
हेही वाचा…“महाविकास आघाडी सरकार केवळ परिवारासाठी काम करणारे होते, म्हणूनच..,” भाजप नेत्याची जहरी टिका
हेही वाचा…“..तर १ डिसेंबर रोजी महापालिकेला घेराव घालू,” सुप्रिया सुळेंनी पालिका आयुक्ताला दिला इशारा
हेही वाचा…मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हिंदूह्यदयसम्राट म्हणून कुणी केला उल्लेख ? भाजपची पहिली प्रतिक्रिया
हेही वाचा…“आता ना भाजप ना काॅंग्रेस, आता फक्त भुजबळसाहेबच हेच ओबीसीचे नेते”