नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात गायरान जमीनी आणि सिल्लोड कृषी महोत्सवाचा मुद्दा चांगलाचं गाजला. वाशिम जिल्ह्यातील गायरानासाठी आरक्षित असलेल्या 37 एकर जमीन नियमित करण्याच्या आदेशावरून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सत्तार यांना नोटीस पाठवली आहे. तर सिल्लोड महोत्सवासाठी कोट्यावधी रूपये जमा करण्याचे आदेश त्यांनी एका बैठकीत दिले आहेत. यावरून आता राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..
राज्याच्या कृषीमंत्र्याने एका खाजगी व्यक्तीला गायरान जमीन देण्याची कृती केली आहे. हा विषय हायकोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने या मंत्र्यावर गंभीर ताशेरे ओढले आहेत. एखाद्या मंत्र्यांवर कोर्टाने ताशेरे ओढल्यानंतर सभागृहाच्या प्रथा-परंपरेनुसार यापुर्वी दोन मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते. अशी आठवण दिलीप वळसे पाटील यांनी सभागृहात करून दिली.
संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, त्यामुळे इतकी बेदरकार कृती केल्याने या मंत्र्याला सभागृहात क्षणभर देखील बसायचा अधिकार नाही. एकतर सरकारने त्यांची ताबाडतोब मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी आणि त्यांच्याविरोधात फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केली आहे.
Read also
- सोमय्यांकडून शरद पवारांचं कौतुक, म्हणाले, “मी त्यांच्याकडून एक गुण घेतलाय, तुम्हीही घ्या”
- “खंड न पडता खाता श्रीखंड, सांगा एकनाथराव…यासाठीच केला होता का बंड”; राष्ट्रवादीने डिवचलं
- “भाजपचं शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न,एकनाथ भाऊंना कधी समजणार?” सुषमा अंधारे
- “आदित्य ठाकरे सोन्यासारखा मूलगा, त्यांना बदनाम करणाचे विरोधकांचे प्रयत्न”
- “नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य, त्यांना कवडीचीही किमंत कुणी देत नाही”