सोलापूर: भाजपकडून शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे एकनाथ शिंदे यांना समजत नाही. शिंदे गटाचे 40 पैकी 20 आमदार फोडून भाजपला स्वत:चा पक्ष मोठा करायचा आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदासाठी थेट नरेंद्र मोदींनाही आव्हान देतील, असं वक्तव्य शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे.
“अजित पवारांनी अब्दुल सत्तारांना घेतलं धारेवर, थेट राजीनाम्याची मागणी”
पंढरपुर येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही नाही. हे आमच्या एकनाथ भाऊंना कधी समजणार? भाजपच ट्रॅप टाकत आहे, हे एकनाथ शिंदेंच्या लक्षात यायला हवं. भाजपच अडकवत आहे. भाजपच संपवत आहे. असंही त्या म्हणाल्या.
“…तो पर्यंत सीमाभाग हा केंद्रशासित करा”, उद्धव ठाकरेंची सभागृहात मागणी
दरम्यान, मागील काही दिवसापासून सुषमा अंधारे ह्या बंडखोर आमदारांवर तुटून पडत आहेत. बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन त्या शिंदे गटावर आरोप-प्रत्यारोप करीत आहेतय. त्यामुळे सुषमा अंधारे सध्या राज्याच्या राजकारणात चांगल्याच चर्चेत आल्या आहेत.
Read also
- “आदित्य ठाकरे सोन्यासारखा मूलगा, त्यांना बदनाम करणाचे विरोधकांचे प्रयत्न”
- “नारायण राणेंचं कर्तृत्व शुन्य, त्यांना कवडीचीही किमंत कुणी देत नाही”
- बाळासाहेब थोरातांना भोवळ, हाताला, खांद्याला दुखापत, मुंबईत आणणार..
- “महाराष्ट्रातील सर्वात मोठा गद्दार, अब्दुल सत्तार, अब्दुल सत्तार…” अन् परिसर दणाणला
- संजय राऊतांनी ट्विट केला सुतळी बॉम्बचा फोटो, विरोधक धाकधुकीत