औरंगाबाद : एमआयडीसीमधील उद्योगासाठीच्या जागा नियमबाह्यपणे रहिवासी आणि व्यावसायिक हेतूसाठी देऊन माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी कोट्यवधी रूपयांचा घोटाळा केला असल्याचा आरोपा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यावर त्यांनी या प्रकरणाबाबत लवकरच खटला दाखल करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
“कितीही गुन्हे दाखल करा, माझ्यावर त्याचा काहीही फरक पडणार नाही”, संतोष बांगर
शहरातील चिकलठाणा, वाळूज येथील औद्योगिक वसाहतींमध्ये उद्योग उभारणीसाठी सवलतीच्या दरात उद्योजकांना प्लॉट, जमिनी देण्यात आल्या. सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना त्यांनी औद्योगिक प्लॉटचे रूपांतर नियमबाह्यरीत्या करून ते बिल्डरांना देण्यात आले होते. ज्या उद्देशासाठी ही जमीन घेण्यात आली होती. त्याऐवजी त्या जमिनीचे कन्व्हर्जन करून प्लॉट निवासी, कमर्शियल करण्यात आले. असं इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
“बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांना भाजप विसरले”, सामानातून भाजपवर हल्लाबोल
यासंदर्भात अजून एक ट्विट इम्तियाज जलील यांनी केला आहे. माजी मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रातील राखीव एमआयडीसी औद्योगिक जमिनी निवासी/ व्यावसायिक जमिनीत रूपांतरीत करून मोठ्या बिल्डकरांकडून कोट्यवधी रूपये घेऊन मोठा भष्ट्राचार केला आहेत. मी हा भ्रष्टाचार बाहेर आणल्यानंतर ते माझ्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करणार होते. परंतु अद्याप पर्यंत त्यांनी हा खटला केला नाहीत. त्यांना माझे आव्हान आहे की जर त्यांनी आणि त्यांच्या मुलाने भ्रष्ट्चार केला नाहीत तर त्यांनी लवकरच हा खटला दाखल करावा. आता न्यायालयातच हे स्पष्ट होईल की कोणाची बाजू योग्य आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
माजी मंत्री @Subhash_Desai यांनी महाराष्ट्रातील राखीव @midc_india औद्योगिक जमिनी निवासी/व्यावसायिक जमिनीत रूपांतरित करून मोठ्या बिल्डरांकडून कोट्यवधी रुपये घेऊन मोठा भ्रष्टाचार केला आहेत.मी हा भ्रष्टाचार बाहेर आणल्यानंतर ते माझ्याविरोधात न्यायालयात मानहानीचा खटला दाखल करणार होते.
— Imtiaz Jaleel (@imtiaz_jaleel) January 28, 2023
Read also
- “एमआयएमशी युती झाल्यास आघाडीतून शिवसेना बाहेर पडणार का?” भाजप नेत्याचा सवाल
- अद्वय हिरेंच्या प्रवेशाबाबत भुसेंची प्रतिक्रिया म्हणाले, “ते माझ्याविरोधात उभे राहणार मग..”
- “महात्मा गांधींच्या विचारांची हत्या पंडीत नेहरूंकडून”, सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त व्यक्तव्य
- “सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरा”, भाजपकडून कार्यकर्त्यांना आदेश
- भोसरीतील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ८ हजार विद्यार्थी- पालकांचा सहभाग , मोदींच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण