मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी घटक पक्षांनासोबत घेऊन मोर्चेबांधणी करायला सुरूवात केली आहे. यातच शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात युतीची घोषणा केली आहे. या युतीमुळे राज्यातील राजकीय समीकरणं पुर्णपणे बदलली आहेत. यातच आता एमआयएमने महाविकास आघाडीशी युती केली तर शिवसेना महाविकास आघाडीची साथ सोडणार का ? असा खोचक सवाल भाजपचे नेते केशव उपाध्यय यांनी केला आहे.
“बाळासाहेब ठाकरे, वीर सावरकरांना भाजप विसरले”, सामानातून भाजपवर हल्लाबोल
मुंबईतील आंबेडकर भवन याठिकाणी शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येत असल्याची घोषणा दोन्ही बाजूंच्या नेत्यांनी केली. त्यानंतर राज्यात राजकारणाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. असं राऊतांनी म्हटलं आहे. त्यातच आता एमआयएमने महाविकास आघाडीसोबत निवडणुका लढवल्या तर शिल्लक सेना महाविकास आघाडीची साथ सोडणार का ? की सत्तेसाठी जसे बाळासाहेबांचे हिंदुत्व गुंडाळून ठेवले तसेच मतांसाठी एमयआयएमशीसुद्धा हातमिळवणी करणार का ? असा सवालही त्यांनी केला आहे.
“पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी भाजप सर्व पक्षांना पत्र पाठवणार”
दरम्यान, आगामी काही काळात राज्यात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यातच आता महाविकास आघाडी विरूद्ध शिंदे-फडणवीस अशी लढत होणार आहे. मात्र वंचितला आघाडीत स्थान द्यायचं की नाही, याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे येत्या काळात काय राजकीय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं आहे.
एमआयएमचे खा. इम्तियाज जलील यांची युती साठी #मविआला ॲाफर- एमआयएमने मविआसोबत निवडणुका लढवल्या तर शिल्लक सेना महाविकास आघाडीची साथ सोडणार का? की सत्तेसाठी जसे बाळासाहेबांचे हिंदुत्व गुंडाळून ठेवले तसेच मतांसाठी एमआयएमशीसुध्दा हातमिळवणी करणार?
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 28, 2023
Read also
- अद्वय हिरेंच्या प्रवेशाबाबत भुसेंची प्रतिक्रिया म्हणाले, “ते माझ्याविरोधात उभे राहणार मग..”
- “महात्मा गांधींच्या विचारांची हत्या पंडीत नेहरूंकडून”, सदाभाऊ खोतांचं वादग्रस्त व्यक्तव्य
- “सत्यजीत तांबेंना निवडून आणण्यासाठी मैदानात उतरा”, भाजपकडून कार्यकर्त्यांना आदेश
- भोसरीतील ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमात ८ हजार विद्यार्थी- पालकांचा सहभाग , मोदींच्या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण
- “कितीही गुन्हे दाखल करा, माझ्यावर त्याचा काहीही फरक पडणार नाही”, संतोष बांगर