मुंबई : महाराष्ट्रात पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या गोष्टीला आता महिना देखील उलटून गेला. कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणांवरून येथे मदत जाहीर करण्यात आली. राज्य सरकारकडून येथील लोकांना मदत जाहीर केली. येथील व्यापाऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु योग्य अशी मदत यांच्या पर्यंत पोहोचली नाही. या गोष्टीची दखल महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसच्या सरचिटणीस सोनललक्ष्मी घाग यांनी घेतली आहे. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या संदर्भात पत्र पाठवून तातडीच्या मदतीची विनंती केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला वाढता विरोध, मनसेही मैदानात
घाग यांनी ट्विट करत हे पत्र शेअर केले आहे. त्यामध्ये त्यांनी नमूद केले आहे कि, पुरामुळे कोकणात प्रचंड नुकसान झाले आहे. प्रामुख्याने रत्नागिरी आणि रायगड भागाला याचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. नाना पटोले यांनी या भागाचा दौरा केला आहे. पाहणी केली आहे. व्यापारी वर्गाच्या व्यथा जाणून घेतल्या. राज्य सरकारने या संदर्भात नुकसान भरपाईची घोषणा केली आणि व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. परंतु जाहीर केलेली मदत अजूनपर्यंत व्यापारी वर्गाच्या पदरात ना पडल्यामुळे व्यापारीवर्ग मेटाकुटीला आला आहे. नुकसानीची भीषणता किती आहे, व्यापारी वर्गाला किती मोठा फटका बसला आहे याची पटोले याना जाणीव आहेच. जाहीर केलेली मदत हि व्यापारी वर्गाच्या खात्यात जमा करावी आणि व्यापारी वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न करावा , अशी विनंती घाग यांनी या पत्रात केली आहे.
‘राजकारणात कुणाला कुठल्या चेंडूवर बोल्ड करायचे, हे क्रिकेटमुळे चांगले माहिती!’
पूरग्रस्त व्यापाऱ्यांना अद्याप राज्य सरकारकडून मदत खात्यामध्ये जमा झालेली नाही हे या पत्रावरून स्पष्ट दिसत आहे. केवळ मदत जाहीर करण्यात आली परंतु अद्यापही प्रत्यक्ष त्यांना ती मदत मिळालेली नाही. यावरून राज्य सरकारचा हा बेजबाबदारपणा येथे दिसून येत आहे. घाग यांच्या या पत्रावरून काँग्रेसला घरचाच आहेर मिळाल्याचे दिसून येत आहे.
Read Also :
- ‘काही जण दिल्लीत जाऊन फक्त उभेच राहतात’, उद्धव ठाकरे
- आरक्षणाचा अध्यादेश न्यायालयात टिकला नाही तर ओबीसींच्या डोळ्यात धुळफेक ठरेल
- महापालिकेवर ‘मनसे राज’ आणण्यासाठी राज ठाकरे पुन्हा एकदा नाशिक दौऱ्यावर
- शिवसेनेला पडली मोठी खिंडार: ७ नगरसेवक फोडले, अजून १२ जण पक्ष सोडून जाणार
- भाजप नगरसेवकांने केला महिलेचा विनयभंग? किरीट सोमय्या म्हणतात, चौकशी झाली पाहिजे