पक्षांतर्गत गटबाजी अन् समन्वयाअभावामुळे नकारात्मक चर्चा
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्पर्श घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्थानिक नेता आणि माजी नगरसेविका यांच्यातील खुन्नसीच्या राजकारणाचा फटका स्वपक्षाला बसला असून, राष्ट्रवादीची अवस्था ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’अशी झाली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कानावर हात ठेवण्याची भूमिका घेतल्यामुळे राष्ट्रवादीच्या अंतर्गत वादाचा भाजपाला फायदा होत आहे.
‘स्पर्श’ हॉस्पिटल गैरप्रकारात हात असलेली राष्ट्रवादीची “ती” कथित नगरसेविका कोण?
पिंपरी-चिंचवड महापालिकेने कोरोनाकाळात भोसरी येथील रामस्मृती व हिरा लॉन्स येथे कोविड सेंटर उभारण्यासंदर्भात स्पर्श हॉस्पिटलला आदेश दिले होते. मात्र,सदर ठिकाणी कोणतीही सुविधा न उभारता तसेच त्या ठिकाणी एकाही रुग्णावर उपचार न करता स्पर्श हॉस्पिटलने महापालिकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने महापालिकेला बील सादर केले होते. या बिलाला स्थायी समितीची मान्यता न घेताच तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अजित बाबुराव पवार यांनी अत्यंत घाईने स्पर्श हॉस्पीटलला ३ कोटी १४ लाख रुपयांचे बिल अदा केले होते. कोरोना साथीचा गैरफायदा घेत महापालिकेच्या पैशांचा गैरप्रकार केल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आर.डी धनुका आणि न्यायमूर्ती मकरंद सुभाष कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सुनील कांबळे यांच्या वतीने ॲड. विश्वनाथ पाटील व ॲड. केवल आह्या यांनी बाजू मांडली. या सुनावणीमध्ये उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनावर ताशेरे ओढले आहेत.
आम्ही गोट्या खेळत होतो का? पुण्यात भरकार्यक्रमातच शिवसेना -राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये हमरीतुमरी
दरम्यान, स्पर्श प्रकरणात राष्ट्रवादीचे माजी महापौर योगेश बहल आणि माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर या दोघांमधील सत्ता संघर्षाची चर्चा रंगली होती. मात्र, आजवर दोघांच्या नावांचा कुठेही थेट उल्लेख झालेला नव्हता. मात्र, उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि प्रेसनोट माजी महापौर योगेश बहल यांच्या मेल-आयडीवरुन प्रसारमाध्यमांना मिळाली. त्यामुळे बहल या प्रकरणात आहेत, याला पुष्टी मिळाली.
दुसऱ्या बाजुला माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत धर या स्पर्श हॉस्पिटलच्या कामासाठी आग्रही होत्या. त्यांनी हॉस्पिटल प्रशासनाच्या संपर्कात होत्या. त्यांनी निविदा प्रक्रियेच्या स्पर्धेत उतरून अनेक बड्या ठेकेदारांना आव्हान दिले. त्यापैकी बहल यांच्या संपर्कातील ठेकेदाराला काम मिळाले नाही. त्यामुळे ‘नाकापेक्षा मोती जड’अशी भावना निर्माण झाल्यामुळे सुलक्षणा शिलवंत-धर यांना अडचणीत आणण्यासाठी रणनिती आखण्यात आली, असे सांगितले जाते. राष्ट्रवादीतील दोन्ही नेत्यांच्या वादामुळे शहर आणि राज्यातील पक्षश्रेष्ठींनी कानावर हात ठेवल्याचे चित्र असून, यामुळे भाजपाच्या हातात मात्र आयते कोलीत मिळाले आहे.
योगेश बहल यांचे राजकारण : विरोधात गेल्या दोन बायका अन् फजिती ऐका !
बहल-शिलवंत वादाचे कारण काय?
२०१९ मध्ये झालेल्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून आणि एकाच पॅनेलमधून निवडणून आलेले योगेश बहल आणि सुलक्षणा शिलवंत यांच्या आता कमालीचा राजकीय संघर्ष पहायला मिळत आहे. मास्क खरेदी आणि स्पर्श प्रकरणात बहल यांनी शिलवंत यांच्यावर अप्रत्यक्ष राजकीय प्रहार केला. मात्र, बनावट बँक गॅरंटी आणि ऑक्सिजन पुरवठा प्रकरणात अप्रत्यक्षपणे शिलवंत यांनी बहलांना घायाळ केले. एकाच प्रभागातून निवडून आल्यानंतर सुरू झालेल्या या संघर्षाला २०१९ मधील विधानसभा निवडणुकीची झालर आहे. या निवडणुकीत शिलवंत यांना विधानसभेचे तिकीट मिळाले. मात्र, ऐनवेळी माघार घेण्याबाबत राजकारण झाले. त्या राजकारणाचा केंद्रबिंदू बहल होते. आपल्यापेक्षा ‘ज्युनिअर’असलेल्या शिलवंत पहिल्या टर्ममध्येच आमदारकीची स्वप्ने पाहत आहेत, ही बाब बहलांना रुचली नाही. त्यामुळे बहल-शिलवंत वादाची ठिणगी पडली. या ठिणगीचे रुपांत आता आगीत झाले आहे, असे राजकीय जाणकारांचा निरीक्षण आहे.
पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडेवरील गोळीबार प्रकरणाला नाट्यमय वळण
आगामी निवडणुकीत फटका बसणार..?
स्पर्श घोटाळ्यासंदर्भात अनेकदा प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली. पिंपरी-चिंचवड भाजपाने या मुद्यावरुन राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला. स्थानिक नेत्यांमधील वादावर तोडगा काढून राष्ट्रवादीने या प्रकरणात न्याय्य भूमिका घेतली पाहिजे. मात्र, तसे होताना दिसत नाही. योगेश बहल हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत, तसेच सुलक्षणा शिलवंत या युवा नेते पार्थ पवार यांच्या समर्थक आहेत. त्यामुळे कोण बरोबर- कोण चूक…यावर पक्षश्रेष्ठी चर्चा करीत नाहीत. चर्चा झालेली असेल, तर त्यावर समाधानकारक तोडगा निघत नाही. समन्वयाचा अभाव आणि अंतर्गत गटबाजीमुळे राष्ट्रवादीबाबत स्थानिक पातळीवर नकारात्मक चर्चा होत असून, याचा फटका आगामी महापालिका निवडणुकीत बसू शकतो, असे राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे.
Read also:
- माझ्या सोबत राऊतांना मतदान करायला पाठवा, नाही तर बोलतील की,..; देवेंद्र भुयारांचा राऊतांना टोला
- “महंमद तुघलकी सारखी अग्निपथ योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी”; सचिन खरात
- “घोडा बाजार जवळच आहे, त्याचा निकाल लवकरच लागणार”; बच्चू कडू
- “शरद पवार राष्ट्रपती पदासाठी उभे राहिले असते तर पारडे त्यांच्याकडे झुकले असते”
- “शरद पवारांचं फक्त नाव वाजवण्यासाठी चर्चा”; गुणरत्ने सदावर्तेंनी साधला पवारांवर निशाणा