मुंबई : नऊ जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली. मात्र, मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. यावेळी कामगार शिष्टमंडळाला कोंडून ठेवले, असा आरोप गुरुवारी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला.
नवाब मलिक यांनी झईदा वानखेडे यांचा मृत्यूचा दाखला ट्विट करत पुन्हा माजवली खळबळ
सदावर्ते म्हणाले की, नऊ जणांच्या शिष्टमंडळाने राज्य सरकारसमोर केवळ विलीनीकरणाची मागणी केली होती. मात्र, मंत्री कालच्या बैठकीत खोटे बोलले. पत्रकार परिषदेत दोन आमदार गेले आणि आम्ही कामगारांचे नेते म्हणून भूमिका मांडत आहोत म्हणाले. काल कामगार शिष्टमंडळ गेले. त्यांना आत कोंडून ठेवले गेले. बाहेर येऊ दिले नाही. शिष्टमंडळ बाहेर येऊन सत्य सांगतील म्हणून त्यांना पोलिसांच्या बंदोबस्तात बाहेर काढले. त्यामुळे अनिल परबांचा आम्ही राजीनामा मागत आहोत. त्यांना तत्काळ बडतर्फ करा. अन्यथा त्यांची तक्रार राज्यपालांकडे करू, असा इशारा त्यांनी दिली.
‘देशमुखांच्या सांगण्यावरून पोलीस खात्यात रुजू झालो’; सचिन वाझेंचा खळबळजनक जबाब
सदावर्ते म्हणाले की, एस. टी. कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येबद्दल राज्यातील 250 डेपोतील कर्मचाऱ्यांनी दुखवटा पाळला. मात्र, याचा कळवळा खासदार सुप्रिया सुळेना आला नाही. त्यांना आर्यन खानचा कळवळा आला होता. मग आत्महत्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीला का गेला नाहीत, असा सवाल त्यांनी यावेळी केला. पवारांनी काल कलरफुल राजकारण केले. मात्र, ते परीक्षेत नापास झाले, अशी टीकाही त्यांनी केली.
Read Also :
- वानखेडे कुटूंबीयांबद्दल ९ डिसेंबरपर्यंत कोणतीही पोस्ट करणार नाही; नवाब मलिकांची कोर्टात माहिती
- माझा पराभव झाला, म्हणून कट कारस्थान करणाऱ्यांनी धिंगाणा घातला; शशिकांत शिंदेंचा आरोप
- एसटी कर्मचाऱ्यांचा पण गिरणी कामगार करणार का? संजय राऊतांचा हल्लबोल
- खोत-पडळकरांनी आंदोलन सोडलं, पण आंदोलक एसटीची घंटी वाजू देणार नाही..
- फरार घोषित केलेले परमबीर सिंग अखेर आले समोर; मुंबईत दाखल झाल्याची माहिती