कोल्हापूर – यंदाची राज्यसभा निवडणूक चर्चेत आहे. संभाजी राजे छत्रपतींना शिवसेनेकडून पाठिंबा न मिळल्याने त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर शिवसेनेने कोल्हापूरचेचे शिवसेनेचे नेते संजय पवार यांना उमेदवारी दिली. त्यानंतर भाजपने धनंजय महाडिकांना उमेदवारी दिली.आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे यंदाच्या राज्यसभेच्या निवडणुकीत कोल्हापूर चांगलंच चर्चेत आहे.
“प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
उमेदवारी जाहीर होताच धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, राज्यसभेवर तिसरी जागा भाजपची असणार आहे. यासाठी आम्हाला 10 मतांची आवश्यकता असून त्याची व्यवस्था आम्ही केलीय. भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये सध्या नाराजी पहायला मिळत आहे. त्यामुळं याचा फायदा आम्हाला निश्चित होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होणार नाहीय. तसंच काँग्रेसच्या नाराजीचा फायदाही आम्हाला होणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची नोकरी जाणार? केंद्र सरकारकडून हालचाली सुरू
राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढलीय. शिवसेना, काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. त्यानंतर भाजपकडून काल दोन यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या जाागेचा सस्पेन्स कायम होता. अखेरीस तिसरी जागा लढवणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.
“आमची तेव्हाही इच्छा होती, अन् ती आजही आहे”; बाळासाहेब थोरांतांचं संभाजी राजेंबाबत वक्तव्य
कोण आहेत धनंजय महाडिक?
2004 मध्ये धनंजय महाडिक यांनी कोल्हापुरमधून राष्ट्रवादीचे सदाशिवराव मंडलिक यांच्या विरोधात शिवसेनेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी शिवसेनेतून फारकत घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवली.2014 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीचे खासदार म्हणून त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. 2017, 2018 मध्ये त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना संसदरत्न पुरस्कारही मिळाला आहे.लोकसभेत कोल्हापूरचे प्रतिनिधित्व केल्यानंतर त्यांनी 2019 च्या निवडणुकीत त्याच जागेवरून भाजपकडून निवडणूक लढवली. मात्र 2019 ची लोकसभा निवडणुकीत शिवसेना नेते संजय मंडलिक यांनी त्यांचा पराभव केला.
Read also:
- “मुख्यमंत्र्यांच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”
- आयुष्याची ४५ वर्षे सामाजिक, राजकीय जीवनात..; चंद्रकांत पाटलांचा सुप्रिया सुळेंबाबत जाहीरनामा
- “घसा ओरडुन पत्रकार परिषदा घेणाऱ्या किरीट काकांना राज्यसभेवर न घेतल्याने सामान्य जनता नाराज”
- मुंबई महापालिकेवर कमळ फुलणार; सट्टा बाजारात भाजपला सर्वात पसंती
- “मुख्यमंत्रीपदाची इच्छा बोलल्यानंतर काही लोकांवर का आभाळ कोसळ्यासारखं झालं”?