मुंबई : बॉलिवुड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला काल ड्रग्ज प्रकरणी एनसीबीने क्लिनचीट दिली आहे. त्याच्यावर जवळपास 6 हजार पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र त्या आरोपपत्रात कुठेही ड्रग्ज बाळगले नसल्याचे एनसीबीने म्हटले आहे. याप्रकरणाबाबत एनसीबीचे तात्कालीन अधिकारी समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारचा बुरखा मुंबईतल्या आंदोलनानं आज टराटरा फाडला
2 ऑक्टोबर रोजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रुझवर धाड टाकून आर्यन खानसह अन्य पाच जणांना ताब्यात घेतले होते. मात्र ही कायदेशी बेकायदेशीर असल्याचे सांगत राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यानंतर समीर वानखेडे यांच्याविरोधात नवाब मलिक यांनी आरोपांची गरळ ओकली होती.
“मनात काहीच किंतु-परंतु नाही, परंतु मी भाजपच्या दोन नेत्यांची शिकार करणार”
आर्यन खानला क्लिनचीट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांच्याबाबत आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. एसचीआयच्या चौकशी अहवालात देखील समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर सवाल केला होता. त्यानंतर त्यांना एनसीबीमधून हटवण्यात आलं व त्यांचे मुळे केडर असलेले डीआरआयमध्ये करण्यात आले होते. अनेकदा याप्रकऱणात समीर वानखेडे यांचे जबाब देखील नोंदवण्यात आले होते.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता होती, तेव्हा त्यांनी काय केले ? धनंजय मुंडेंचा भाजपला सवाल
दरम्यान, समीर वानखेडे यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची आता नोकरी देखील जाण्याची शक्यता आहे. त्यापद्धतीच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. त्याचबरोबर त्यांच्या टीममधील अनेक अधिकाऱ्यांच्या अडचणीत देखील वाढण्याच्या शक्यता आहे.
Read also:
- “प्रत्येक आमदारकीची निवडणुक आली की माझ्या नावाची चर्चा होते”; पंकजा मुंडे
- पार्थ पवारांना राज्यसभेची उमेदवारी देऊन राष्ट्रवादी मवाळमध्ये ताकद वाढवणार का?
- दहशतवाद्यांना पैसे पुरवल्या प्रकरणी यासीन मलिकला जन्मठेपची शिक्षा
- “मध्यप्रदेशला न्याय मिळाला पण महाराष्ट्राची पुन्हा फसवणूक झाली”; सुप्रिया सुळे
- मग अडीच वर्ष अजित पवार मंत्रालय झाडत बसले होते का? पडळकरांचा पवारांना खोचक सवाल