पुणे : दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखीच कठीण झाली आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज आहे. अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी संसदेत केली. परंतु त्यांना वारंवार संसदेच्या बाहेर काढण्यात आले. हा भाजप सरकारने सत्तेच्या अहंकारातून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकूनच घेतले नाहीत. त्यामुळे भाजप सरकारच्या या मस्तवालपणा विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने २७ ते ३० डिसेंबर दरम्यान मोर्चा निघणार आहे.
हेही वाचा..“आता पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात”, शेतकऱ्यांसाठी सुप्रिया सुळे मैदानात उतरणार
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा जुलूमी निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षर:श देशोधडीला लावला आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील योग्य बाजार मिळालेला नाही. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा हवालदील झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट रस्त्यावर उतरणार आहे. आता पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात असं म्हणत राष्ट्रवादीने मोदी सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आघाडी सरकारने शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे.
हेही वाचा…“जर रामराज्य आणायचं असेल तर भ्रष्टाचारामुक्त महाराष्ट्र घडवावा लागेल”, आदित्य ठाकरेंचं विधान
दरम्यान, या मोर्चात खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारकडे प्रमुख मागण्या केल्या आहेत. यामध्ये कांदा निर्याद बंदी तात्काळ उठवावी तसेच कांदा निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दुध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. बिबटप्रवण तालुकयात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा. पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून भरपाई तातडीने मिळावी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे शैक्षणिक कर्ज धोरण लागू करावे. अशा मागण्या ठेवल्या आहेत.
भाजपा सरकार, शेतकऱ्यांचे कर्दनकाळ, उद्योगपतींचे कैवारी…
बळीराजाच्या हक्कांसाठी, न्यायासाठी, अस्तित्वासाठी शेतकरी आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा!
२७ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२३
किल्ले शिवनेरी ते जिल्हाधिकारी कार्यालय, पुणेआपल्या प्रमुख मागण्या:-
१)कांदा निर्यात… pic.twitter.com/uADtGILypq— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) December 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा..सुप्रिया सुळेंचं लोकसभेतून निलंबन; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“तुरूंगवास पत्करावा लागला तरी माफी मागणार नाही,” सुषमा अंधारेंचं उपसभापतींना संस्कृतमध्ये पत्र
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकाचा शिंदे गटात प्रवेश, आघाडी अन् अपक्षाचे ५० माजी नगरसेवक शिंदे गटात दाखल
हेही वाचा…अटक होताच प्रकृती बिघडली, आमदारकीही जाणार ? काॅंग्रेसचे माजी मंत्री ‘सुनील केदार’ मोठ्या संकटात
हेही वाचा…मोठी बातमी…! रोहित पवारांचं फेसबुक अकाउंट हॅक, समर्थकांचा फडणवीसांकडे बोट