मुंबई : महानगर पालिकेतील भ्रष्टाचारांबाबत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर पुन्हा हल्लाबोल केला. अजून पुढील एक वर्ष तरी मुंबईतील रस्त्यांची कामे पुर्ण होणार नाहीत. याला जबाबदार एक व्यक्ती घटनाबाह्य मुख्यमंत्री असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
हेही वाचा…“विरोधकांच्या १४१ खासदारांना बाहेर ठेऊन मोठी चुक केली, किमंत चुकवावी लागणार,” शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल
स्ट्रीट फर्निचर घोटाळ्यातील सगळे प्रश्न आम्ही सुनावणीत उपस्थित करू आणि मुंबईला महाराष्ट्राला न्याय मिळवून देऊ. लोकायुक्तींनी स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याची फेब्रुवारी महिन्यात सुनावणी आहे. लोकायुक्तांकडे आम्ही केलेल्या तक्रारीमुळे सुनावणी लागली आहे. तिथे म्यिन्सिपल कमिशनर स्वत: उपस्थित राहतील ही अपेक्षा आहे. जो रस्ता महाघोटाळा आम्ही लोकांसमोर आणला, त्यामुळे ४०० कोटीचे व्हेरिएशन थांबवावे लागले. हा विषय देखील आम्ही लोकायुक्तांसमोर मांडणार असा इशारा देखील आदित्य ठाकरे यांनी दिला आहे.
हेही वाचा..शिंदेंचा ठाकरेंना पहिला दणका, सुजीत पाटकरांची १२ कोटी संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई
दरम्यान, पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, २०१९ मध्ये कोर्टाने दिलेल्या निकालामुळे राम मंदिर बनत आहे. तिथे जाण्यासाठी आम्हाला कुणाच्या आमंत्रणाची गरज नाही. ज्यांचं मंदिर विषयाशी काडीमात्र देणं घेणं नाही. त्यांच्याकडून काय आमंत्रण घ्यायचं ? असा खोचक सवाल करत आपल्याला जर रामराज्य आणायचं असेल तर भ्रष्टाचारामुक्त महाराष्ट्र घडवावा लागेल. असंही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, कुणालाही फसवणार नाही”, कार्यकर्त्यांना अजित पवारांनी दिला हा शब्द
हेही वाचा.शिंदे गटाचा वर, ठाकरे गटाची वधू..! ठाण्यात अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा, मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेते उपस्थित
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाउपराष्ट्रपतींची नक्कल..! नितीन गडकरींनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांना दिल्या कानपिचक्या
हेही वाचा…राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार ? अजित पवार यांना दणका बसणार ?