नवी दिल्ली : संसदेत झालेल्या विरोधी पक्षांच्या खासदार निलंबनासंदर्भात इंडिया आघाडीकडून दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी काॅंग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील सहभाग घेतला. शरद पवारांनी यावेळी बोलतांना मोदी सरकारवर जोरदार टिका केली.
हेही वाचा..पुण्यातील भाजपचे आमदार धास्तावले, ! रिपोर्ट कार्डमुळे झाली पंचाईत, गोंधळ, धाकधुक वाढली
13 डिसेंबर रोजी या देशाच्या संसदेत घडलेली घटना देशाच्या लोकशाहीचे नुकसान करणारी होती. देशाच्या संसदेत अनेक लोक घुसले आणि तिथे जे काही घडले ते देशाच्या गृहमंत्र्यांनी देशवासीयांना आणि सदस्यांना सांगण्याची गरज होती. परंतु त्यांनी तसे केले नाही. विरोधी पक्षातील नेत्यांनी याविरोधात आवाज उठवला. मोदी सरकारने विरोधी पक्षातील १४१ खासदारांना सभागृहाच्या बाहेर ठेऊन फार मोठी चुक केली आहे. त्यांना याची किमंत चुकवावीच लागेल. विरोधकांवर कारवाई केली तर देशातील विरोधकांचा आवाज आपण बंद करू शकतो हे त्यांना आता कळलं आहे. परंतु आज सर्वजण देशाच्या संसदेसाठी आणि लोकशाहीसाठी कितीही किमंत मोजावी लागेल यासाठी आम्ही तयार आहोत. असं शरद पवारांनी म्हटलं.
हेही वाचा…बारामतीत ओबीसी कार्ड खेळण्याचा भाजपचा प्रयत्न ; सुळेंच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्या व्यक्तीला दिली मोठी जबाबदारी
दरम्यान, संकट मोठे आहे, आज प्रत्येक गावात गेल्यावर या देशातील गरीब जनतेच्या उपासमारीचा प्रश्न सोडवणारा शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर गेल्याचे आपण पाहिले आहे. कारखान्यात काम करणारा मजूर आज त्याच्या खऱ्या कष्टाची किंमत न मिळाल्याने दुःखी आहे. आपल्या देशात आदिवासी असो किंवा दलितांचे प्रश्न गावात राहून सुटत नाहीत. त्यामुळे आम्ही फार दु: खी आहोत. संकट खुप मोठे आहे. परंतु आम्ही देखील हार मानली नाही. असंही शरद पवारांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा..शिंदेंचा ठाकरेंना पहिला दणका, सुजीत पाटकरांची १२ कोटी संपत्ती जप्त, ईडीची मोठी कारवाई
हेही वाचा…धुळ्याचा गड कोण जिंकणार ? भाजपसमोर काॅंग्रेसचं कडवं आव्हान, ठाकरेंचीही साथ मिळणार
हेही वाचा…“३ टन खिचडी, ट्रकभर केळी अन् चार लाख पाण्याच्या बाटल्या,” जरांगे पाटलांच्या सभेची जय्यत तयारी
हेही वाचा…काॅंग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांना मोठा धक्का, ‘या’ प्रकरणात कोर्टानं ठरवलं दोषी
हेही वाचा…राज्यात ठाकरे गट लोकसभेच्या ‘या’ २३ जागा लढविणार ; काॅंग्रेस हायकमांडसोबत झाली चर्चा