पुणे : केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा जुलूमी निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षर:श देशोधडीला लावला आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील योग्य बाजार मिळालेला नाही. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा हवालदील झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट रस्त्यावर उतरणार आहे. आता पुरे झाली मन की बात, आता हवी जन की बात असं म्हणत राष्ट्रवादीने मोदी सरकारच्या विरोधात शड्डू ठोकला आहे. लाखांचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणाऱ्या केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आघाडी सरकारने शेतकरी आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे आमदार अपात्र होणार ? अजित पवार यांना दणका बसणार ?
दुष्काळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा यामुळे शेतकऱ्यांची अवस्था आणखीच कठीण झाली आहे. या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करण्याची गरज आहे. ही मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी संसदेत केली. परंतु त्यांना वारंवार संसदेच्या बाहेर काढण्यात आले. हा भाजप सरकारने सत्तेच्या अहंकारातून जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकूनच घेतले नाहीत. भाजप सरकारच्या या मस्तवालपणा विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने २७ ते ३० डिसेंबर दरम्यान मोर्चा निघणार आहे.
हेही वाचा…“विरोधकांच्या १४१ खासदारांना बाहेर ठेऊन मोठी चुक केली, किमंत चुकवावी लागणार,” शरद पवारांचा दिल्लीतून हल्लाबोल
दरम्यान, राष्ट्रवादीचा शेतकरी अक्रोश मोर्चालाला किल्ले शिवनेरीपासून सुरू होऊन पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चाची सांगता ३० डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे होणार असून शेतकरी बांधवांचा आवाज बुलुंद करण्यासाठी, आपल्या बळीराजाला साथ देण्यासाठी या मोर्चा अवश्य सहभागी व्हा. असं आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
केंद्र सरकारने निर्यातबंदीचा जुलूमी निर्णय घेऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अक्षरशः देशोधडीला लावले. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना देखील योग्य बाजार मिळालेला नाही. त्यातच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून बळीराजा हवालदिल झाला आहे. हि अशी भीषण परिस्थिती… pic.twitter.com/IHo9nFNyYQ
— Supriya Sule (@supriya_sule) December 22, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“जर रामराज्य आणायचं असेल तर भ्रष्टाचारामुक्त महाराष्ट्र घडवावा लागेल”, आदित्य ठाकरेंचं विधान
हेही वाचा…“कुठेही मॅच फिक्सिंग नाही, कुणालाही फसवणार नाही”, कार्यकर्त्यांना अजित पवारांनी दिला हा शब्द
हेही वाचा.शिंदे गटाचा वर, ठाकरे गटाची वधू..! ठाण्यात अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा, मुख्यमंत्र्यांसह ठाकरे गटाचे नेते उपस्थित
हेही वाचा…उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आले एकत्र, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचाउपराष्ट्रपतींची नक्कल..! नितीन गडकरींनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांसह विरोधकांना दिल्या कानपिचक्या