मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षाचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते फडणवीसांना तसेच एकनाथ शिंदे यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. याच पार्श्वभूमीवर बिचारे मुख्यमंत्री, मला त्यांची काळजी वाटते असं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील टीका करत शिंदे-फडणवीस सरकारला डिवचलं आहे.
“औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही”
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पत्रकारांशी संवाद साधताना किंवा पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे बोलाताना अडखळले आहेत. यावरूनच आता नवीन सरकार गोंधळलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा अपमान होतोय आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान हे बिचारे मुख्यमंत्री, त्यांचा मागे खूप मोठं षढयंत्र असल्याचं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टोला लगावला आहे.
उद्धव ठाकरेंचा ऑगस्टपासून महाराष्ट्रात झंझावत दौरा! बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर देणार
पुण्यातील महिला समारंभात सुप्रिया सुळे बोलत होत्या. यावेळी त्या म्हणाल्या की, कोण कुठल्या पक्षात आहे, हे आजकाल कळतच नाही. मी स्वतःच गोधळात आहे. सध्या जे राजकारण सुरू आहे ते महारष्ट्राला न शोभणारं आहे. मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते. त्यांना प्रॉम्प्टींग करणं चिठ्ठी देणं अशा कृतीतून मुख्यमंत्र्यांना कमीपणा दाखवायचं काम उपमुख्यमंत्री करत आहेत अशी टीका सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस याच्यावर केली आहे.
उद्धव ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का; औरंगाबादसह, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती
दरम्यान, अजित पवार म्हणाले होते की, सराकार बदल्यानंतर आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे. आपत्ती व्यवस्थापनाला संचालक नाही. अनेक वेळा पूर, ढगफुटी अशी संकटे येतात. त्यावेळी मदत सचिव महत्वाचा असतो. पण सध्या सचिव नाही. हे सरकार अपयशी आहे. 165 आमदारांचा पाठिंबा असताना मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यास हे सरकार का घाबरतय. यांना कोण थांबवलय हे राज्याच्या जनतेला समजलं पाहिजे. असंही अजित पवार म्हणाले आहेत.
Read also
- “फडणवीस राज ठाकरेंच्या घरी”; मंत्रिपदाबाबत राज ठाकरे म्हणाले की..;
- “आम्ही आमचं सरकार मजबुतीने चालवतोय”; पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर
- “सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक”; अजित पवारांचा खोचक टोला
- “..लवकरच शिल्लक यात्रा काढा”; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- “उद्धव ठाकरेंनी घेतलेले चुकीचे निर्णय थांबवले जातील”; नामांतराच्या निर्णयावरून सत्तारांची प्रतिक्रिया