पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यातच महायुतीसोबत मनसे युती करणार असल्याची चर्चा सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुरूवातीला केंद्रीय मंत्री अमित शाह, त्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतही चर्चा केलीय. त्यामुळे ट्रिपल इंजीनला आता मनसेचाही डब्बा जोडला जाणार अशी चर्चा सुरू आहे.यावरून खासदार सुप्रिया सुळे यांनी मोठं भाष्य केलं.
हेही वाचा…मनसेच्या महायुतीतील सहभागाची आजच घोषणा ; राज ठाकरेंना किती जागा? हालचालींना वेग
दिल्लीची अदृश्य शक्ती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष, शिवसेना आणि मनसे या तिन्ही महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्षांविरोधातकटकारस्थान करत आहे. राज ठाकरे यांना विनंती आहे की, त्यांनी आपली ओळख ठेवावी, त्यांची महाराष्ट्राला गरज आहे.मराठी माणसाचे कंबरडे मोडण्याची पाप अदृश्य शक्ती करत आहे. ही शक्ती महाराष्ट्राच्या मागे का लागली आहे ? असा सवालही त्यांनी केलाय.
हेही वाचा…रामटेक अन् नागपुरमध्ये पहिल्याच दिवशी ११३ अर्जांची विक्री, ४०० पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
पुढे बोलतांना ते म्हणाले की, मनसे हा मराठी स्वाभिमान, मराठी भाषेवर प्रेम करणारा पक्ष म्हणून स्थापन झाला. त्या मनसेचे लोक जर शिवसेनेच्या चिन्हावर लढत असतील तर त्यांच्या अस्तित्वाचे काय होणार ? मनसे पक्ष राहणार की नाही राज ठाकरे यांना त्यांच्याच चिन्हावर लढायला दिले पाहिजे. त्यांचा पक्ष संपवण्याचे पाप अदृश्य शक्ती का करत आहे ? असा सवालही केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…ऐन निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेसच्या उमेदवाराला घेरलं ; रश्मी बर्वे म्हणाल्या, “‘माझ्या विरोधात षडयंत्र”
हेही वाचा…“तोपर्यंत पुण्याची निवडणुक एकतर्फी होऊ देणार नाही”, वसंत मोरेंनी घेतला मोठा निर्णय
हेही वाचा..पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंची ताकद मिळणार ; बीडचं मैदान महायुतीच मारणार ?
हेही वाचा…“पैलवान कधीच म्हातारा होत नसतो”, शरद पवारांचा उल्लेख करत ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
हेही वाचा…रणजित सिंह निंबाळकरांच्या उमेदवारीवर भाजप ठाम ; नाराजींची नाराजी भाजप दुर कशी करणार ?