मुंबई : बारामती अॅग्रो कंपनी कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत आज इडीकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची चौकशी सुरू आहे. रोहित पवार इडीच्या कार्यालयात जात असतांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुंबईत इडीच्या कार्यालयाबाहेरील परिसर दणाणून सोडला. तर रोहित पवारांच्या कारवाईवरून अनेकांनी सरकारवर जोरदार टिका केली. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“रोहित पवारांवर सुडाची कारवाई, शेवटपर्यंत लढत राहू,” सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
आदित्य ठाकरे म्हणाले की, आज जी वेळ राजकारण्यांवर आली आहे ती उद्या पत्रकारांवर येऊ शकते. सुरज चव्हाण यांना अटक केली ही एकतर्फी कारवाई आहे. ईडी या कंपनीच्या मालकांवर कारवाई करणार आहे की नाही ? रोहित पवार, रविंद्र वायकर, किशोरी पेडणेकर या सगळ्यांना हैराण केलं जात आहे. फक्त महाराष्ट्रातच नाही तर भाजपचं इतर राज्यांतही हेच चाललं आहे. अशी टिका देखील आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
दरम्यान, आमच्या लढाईत दुर्दैवाने अनेक यंत्रणांचा गैरवापर केला जातो. पार्लमेंटचा डेटा असं सांगतो की, ९० ते ९५ टक्के केसेस या विरोधी पक्षावर आहेत. ज्या इन्कमटॅक्स, सीबीआय आणि ईडीच्या आहेत. त्या अतिशय स्वायस्त संस्था होत्या. असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
हेही वाचा…रामलल्लाच्या मिरवणूकीवर दगडफेक, मग थेट बुलडोझर कारवाई, मीरा रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काही आश्चर्याची गोष्ट नाही. त्याने एक मोठी संघर्ष यात्रा काढली. तो आज महाराष्ट्रात शेतकरी, कष्टकरी, शोषित, पीडीत, युवक आणि नवीन पिढीसाठी काही करू पाहतो. त्यामुळे कदाचित लोकांमध्ये अशी चर्चा दबक्या आवाजांनी ऐकू येते की कदाचित हे सुडाचे राजकारण असू शकते. अशी प्रतिक्रिया देखील सुप्रिया सुळे यांनी दिलीय.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकांमध्ये अशा चर्चा दबक्या आवाजांनी ऐकू येते की..,” रोहित पवारांच्या ईडी कारवाईवर सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
हेही वाचा…“रोहित पवार इडीच्या चौकशीला आले, आता रवींद्र वायकर कधी येणार?” भाजपचा तिखट सवाल
हेही वाचा…लोकसभेपुर्वी इंडिया आघाडीत मोठी फुट , ममता बॅनर्जींनी केली मोठी घोषणा
हेही वाचा…नदीपात्रात बोट उलटली, ६ महिला बुडाल्या, नदीकाठवरच नातेवाईकांचा आक्रोश
हेही वाचा…“ईडीच्या भीतीने भाजपच्या बिळात लपलेल्या उंदरांना लवकरच बाहेर काढू”, ठाकरे गटाने दिला इशारा