मुंबई : विधान परिषदेमध्ये विरोधकांनी मांंडलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांनी मांंडलेल्या चर्चा सुरू होती. यावेळी २०१९ मध्ये केलेल्या तानाजी सावंत यांच्या विधानाचा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुनरच्चार केला. खेकड्यांमुळे धरण फुटलंय हे वक्तव्य एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा विधान परिषदेमध्ये केले. त्यावर कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
“गुलाबराव आपण खाली बसा, इथे तुमचा काय संबंध?”; अन् सभागृहात निलम गोऱ्हे संतापल्या
त्यावर बोलताना तानाजी सांवत म्हणाले की, मी इंजिनिअरचा विद्यार्थी राहिलो आहे. खेकड्यामुळे धरण फुटलं आहे हे वक्तव्य मी तांत्रिकपणे केले होते. खेकड्यांच्या कोट्यावधी प्रजाती असतात. तसेच ज्यावेळी झाडांच्या फांद्या तोडल्या जातात. त्यावेळी त्यामुळे जमीनाखाली पसरतात आणि पाण्याच्या दबावामुळे ते फाटत जातात. त्यामुळे धरण फुटण्याची शक्यता अधिक असते. असंही तानाजी सावंत म्हणाले.
“काळी दाढी अन् पांढरी दाढी”; भुजबळांची नरेंद्र मोदी व एकनाथ शिंदेंवर टोलेबाजी
त्याबरोबर उन्हाळा जसा जसा वाढत जातो, त्यापद्धतीने ओल जशी जशी खाली जाते. तशी खेकडे पणे खाली जातात आणि ते मोठे होल तयार करतात. तसेच अचानक आलेल्या मोठ्या पावसामुळे तो बांध फाटत जातो. तिवरेचा अहवाल आल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे की, कामकाजाचं निकृष्ठ दर्जा, की या गोष्टीमुळे की खेकड्यामुळे फुटलंय ते त्यातून स्पष्ट होणार आहे. त्याचा विपर्यास विरोधकांनी केला असल्याचंही तानाजी सावंत म्हणाले. त्यावर एकनाथ खडसे यांनी देखील मिश्किलपणे टिप्पणी दिली.
“आता फक्त भाषणावर जीएसटी लावायची बाकी आहे” ; छगन भुजबळांचा केंद्रावर निशाणा
एकनाथ खडसे म्हणाले की, धन्यवाद तुमच्यामुळे माझ्या ज्ञानात भर पडली. कारण मी इंजिनिअर नाही आहे. त्यानंतर शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी देवेंद्र फडणवीस यांनी त्याकाळात हे विधान का काढून घेण्यात आले होते याची माहिती मागिवली होती. त्यावर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी त्यावर हस्तक्षेप केला. तसेच रणजित पाटील यांनी फडणवीस सरकारवर नामुष्कीची आल्याचं वक्तव्य काढून टाकण्याची मागणी केली. त्यावर एकनाथ खडसे यांनी चिमटा काढत. आता खेकड्यांचा विषय संपवा आणि गोगल गायीवर या असं म्हणत सभागृहात मिश्किल टिप्पणी केली.
Read also
- “देवेंद्र फडणवीस पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार”; ब्राम्हण महासंघाचं अमित शाहांना पत्र
- “शिंदे-फडणवीस सरकारचा गोविंदासाठी एक मोठा निर्णय”
- “राष्ट्रवादीच्या पाच बड्या नेत्यांवर ईडीची कारवाई होणार”; भाजप नेत्याचा गौप्यस्फोट
- “ठाणे मुख्यमंत्र्यांचे घर आहे, पण राज्यातील इतर खड्डे कोण बुजवणार?”; एकनाथ खडसे
- “विरोधकांनी पायऱ्यावर गोंधळ करण्यापेक्षा सभागृहात जनतेचे प्रश्न मांडावेत”; धैयशिलराव माने