मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात रोजगाराच्या संधीत महायुती सरकारपेक्षा जास्त वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकारात मिळवलेल्या आकडेवारीवरून भाजपचे तात्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त रोजगार निर्मिती झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरेंच वरचढ ठरतांना दिसत आहे. याबाबत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे. तर यावरून आता भाजपने आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा…शिवसेनेच्या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं ? वाचा सविस्तर
आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विट मध्ये असं म्हटलंय की, देवेंद्र फडणवीस यांच्या ६० महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रातल्या लघू व सुक्ष्म उद्योगांची स्थिती बिकट होती. त्यांच्या ३० ऑक्टोंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ दरम्यानच्या काळात लघू व मध्यम उद्योगात १४,१६,२२४ कोटी रूपयांची गुंतवणुक करण्यात आली. यामधून फक्त ६२,३६,८७८ रोजगार निर्मिती झाली तर उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात फक्त ३० महिन्यात १८,६८,०५५ कोटी रूपयांची गुंतवणूकीतून ८८४७,९०५ रोजगार निर्मिती झाली आहे. त्यामुळे फडणवीसपेक्षा ठाकरेंचं काम यामधून दिसून आलं आहे.
हेही वाचा…भाजपची पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, पाटलांच्या ‘या’ निकटवर्तीय कार्यकर्त्यांचा समावेश
देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळाशी तुम्ही स्पर्धा करुच शकत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वाधिक परकीय गुंतवणूक देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आली. आता तुमचे सरकार गेल्यावर पुन्हा महाराष्ट्र क्रमांक 1 वर आला आहे. अपेक्षित रोजगाराची संख्या विचारुन काय साध्य कराल, आकडेवारी द्यायचीच असेल तर किती रोजगार दिले, ते विचारा. दूध का दूध, पानी का पानी होऊन जाईल. नाहीतर शेतकर्यांना सुद्धा ‘वर्क फ्रॉम होम’चा सल्ला देणारे आपले पिताश्री होतेच ना.. असा खोचक टोला ही भाजपने लगावला आहे.
हेही वाचा…“फडणवीस साहेब समाजात कवडीची किंमत नसलेल्या गोप्याला आवर घाला, अन्यथा..,” अजित पवार गटाने भाजपला दिला इशारा
दरम्यान, अवघ्या ३० महिन्यांच्या कालावधीत उद्योगांमध्ये भरघोस अशी ३५% नी वाढ झाली. रोजगाराच्या संधीमध्येही ४२% नी वाढ झाली आणि हे सगळं गद्दारी करून सरकार पडण्याआधी केवळ ३० महिन्यांच्या कालावधीत, कोरोना संकटाच्या काळात करुन दाखवलं. महाराष्ट्राला अग्रेसर ठेवणारं सरकार जर गद्दारी करून पाडलं गेलं नसतं, तर महाराष्ट्राची कितीतरी पट भरभराट इतक्यात झाली असती. उद्धव ठाकरे यांची दूरदृष्टी, नैपुण्य आणि मविआतील सर्वच सहकाऱ्यांची साथ या जोरावर महाराष्ट्राला सोन्याचे दिवस आले असते. पण आत्ताचे हे लुटमारीचे, गद्दारीचे दिवस लवकरच जातील आणि पुन्हा मविआ सरकार येईल, कारण महाराष्ट्राच्या जनतेला पक्कं ठाऊक आहे, महाराष्ट्रप्रेमी कोण आहे आणि महाराष्ट्रद्रोही कोण आहे ? असा सवाल शिवसेनेचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केलाय.
आदु बाळा,
रक्तात असली इतकी बदमाशी करायची नसते.
माहितीच्या अधिकारात काय विचारले? किती सामंजस्य करार झाले, त्यातून किती रोजगार अपेक्षिले गेले आणि त्याची आकडेवारी मांडून या राज्यातील सुजाण नागरिक अजीबात भुलणार नाही.
आता आम्ही सांगतो, महाराष्ट्रप्रेमी कोण आणि महाराष्ट्रद्रोही कोण?… https://t.co/dUAJSkSkXp— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 17, 2023
READ ALSO :
हेही वाचा…महिलांना ३३ टक्के आरक्षण, मग हाच न्याय मराठ्यांना का नाही? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अहवाल द्यावा लागणार, आतापर्यंत काय कारवाई झाली ?
हेही वाचा…लिहून देतो, आदित्य ठाकरे लवकरच राज्याचे मुख्यमंत्री होणार,” माजी खासदाराचं मोठं भाकित
हेही वाचा…“स्वत : लबाड लांगडा असलेला पडळकर आमदारकीच्या बदल्यात..,” पडळकरांच्या विरोधात राष्ट्रवादी आक्रमक
हेही वाचा…सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर सर्जिकल स्टाईंक, सिंचन अन् बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याची मोदींकडे मागणी