मुंबई : मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या कॅबिनेट मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आपली भूमिका मांडावी असं महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवर आता सरकारमधील कॅबिनेट मंत्रीच भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी करू लागल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावरून मंत्रिमंडळातच आलेबल नसल्याचं आता दिसून येत आहे.
हेही वाचा…ठाकरे गटाला मोठा झटका, ‘या’ माजी महापौर नेत्याला पोलिसांनी घरातून केली अटक, राजकारण पेटणार
राज्यात मराठा विरूद्ध ओबीसी अशा दोन समाजात वाद सुरू झाला आहे तो निर्थक आहे. यावरून मंत्री छगन भुजबळ हे ज्येष्ठ नेते असून त्यांनी थोडा संयम बाळगायला हवा. नाही तर मंत्रिमंडळातून बाहेर पडून त्यांनी आपली भूमिका मांडायला हवी. त्यांच्याबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचार केला पाहिजे. असंही राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलंय.
हेही वाचा…शरद पवारांचं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंना आवाहन, पत्राद्वारे केली ‘ही’ मोठी मागणी
दरम्यान, एका कॅबिनेट मंत्र्यांचं वर्तन योग्य नाही असं म्हणण्याची हिमंत राधाकृष्ण विखे पाटलांनी केली आहे. खरं तर ही हिमंत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी करायला हवी होती. परंतु अशी शंका आहे की शासन पुरस्कृतच हा एल्गार सुरू आहे आणि दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचं काम सुरू आहे. असं ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना दिल्लीचं तिकीट मिळत नाही का ?” सु्प्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
हेही वाचा…ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींना १२ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…अग्निवीर अक्षय गवतेंच्या कुटुंबीयांना फक्त दहा लाखांची मदत, सरकारची शहीदांप्रती अनास्था, वडेट्टीवारांची टिका
हेही वाचा…ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी रविंद्र धंगेकर आक्रमक, धंगेकरांचा पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्याबद्दल ‘तो’ शब्द वापरल्याने ठाकरे गटाच्या नेत्याला अटक, शिवसैनिक आक्रमक, राऊतांनी केली जोरदार टिका