मुंबई : आमचा पक्ष फुटला की नाही, हे काॅंग्रेस ठरवू शकत नाही. आमदार आणि खासदार निघून जातात. पण मतदार हा आमच्याबरोबरच आहे. शिवसेनेयाआधी २३ जागा लढवलेल्या आहेत. त्यापैकी १८ खासदार निवडून आले होते. त्या २३ जागांवर शिवसेना ळडणारच आहेच, अशी भूमिका संजय राऊत यांनी घेतली आहे. सध्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून वाकृयुद्ध सुरू आहे. त्यावरून शिवसेना पक्षात फुट पडली आहे. त्यामुळे त्यांना २३ जागा देता येणार नाही. अशी भूमिका काॅंग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती. त्यावर राऊतांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा...महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ; कुणाला कुठे आणि किती जागा मिळणार ? पाहा संपुर्ण यादी
राष्ट्रीय पक्षाचे लहान-सहान निर्णय दिल्लीत घेतले जातात. आम्ही दिल्लीत इंडिया आघाडीच्या चौथ्या बैठकीसाठी गेल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जून खर्गे यांच्याशी बोललो. महाराष्ट्रातील जागावाटपाची चर्चा दिल्लीत करणे सोयीचे ठरेल, अशी भूमिका आम्ही मांडली होती. खर्गे यांनी आमच्या भूमिकेचे स्वागत केले होते. त्यामुळे काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांशी अधिकृत चर्चाच झालेली नसल्याचंही राऊतांनी सांगितलं आहे.
हेही वाचा..एकनाथ शिंदे ‘ठाण्याचा वाघ’ तर देवेंद्र फडणवीस ‘फ्रायर ब्रॅण्ड’ नेते ; कुणी उधळली स्तुतीसुमने ?
दरम्यान, सध्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफुस सुरू झाली आहे. मागच्या निवडणुकीत आम्ही २३ जागा लढविल्या होत्या. त्या २३ जागा आम्हालाच मिळाव्यात अशी भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे. तर राज्यात सध्या पक्ष फुट झाली आहे. त्यामुळे त्यांना इतक्या जागा देता येणार नाही. असं महाराष्ट्रातील काॅंग्रेसच्या नेत्यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा...“नाना पटोलेंचा प्रश्न नरेंद्र मोदींना आवडला नाही म्हणून..,” राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर घणाघात
हेही वाचा.“तर तुम्ही खासदारकी लढवणार नाही ;”अमोल कोल्हेंना शिरूरमधील मतदारानेच दिलं खुलं चॅलेंज
हेही वाचा..“रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत ‘नागपुर’ ही संघभूमी नाही तर दिक्षाभूमी बनवणार”,कन्हैया कुमारांनी नागपुरातली सभा गाजवली
हेही वाचा…राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! ‘या’ विषयावर झाली ४० मिनिटे चर्चा
हेही वामहेश लांडगे समर्थक विजय फुगेंचा ‘डीपीडीसी’मध्ये बंडाचा झेंडा ! उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अखेर माघार