मुंबई : पंजाब काँग्रेसमध्ये सध्या सुरू असलेल्या राजकीय कलहामुळे आख्ख्या देशात एकच चर्चा सुरू आहे. ती म्हणजे काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? पक्षाचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष राजीनामा देतात, केंद्रीय पातळीवर नेमकं नेतृत्व कुणाचं याविषयी प्रचंड संभ्रम, ज्येष्ठ नेते पक्षातल्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करतात. या पार्श्वभूमीवर विरोधकांना काँग्रेसवर टीका करण्याचं आयतं कोलित मिळालं तर त्यात नवल काहीच नाही. मात्र, काँग्रेससोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने देखील आता काँग्रेसच्या चुका दाखवून त्यांना सल्ला दिला आहे. या परिस्थितीत काँग्रेसनं काय करायला हवं, हे शिवसेनेनं सांगतानाच भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाल्याचं सांगायला देखील शिवसेना विसरलेली नाही. पक्षाचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं काँग्रेसविषयीची भूमिका मांडली आहे.
सरकारमध्ये एकदा निर्णय घेतला की समाधानीच राहायचं असतं; त्रीस्तरीय प्रभाग रचनेवरून दादांनी टोचले कान
गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नसल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे. “नरेंद्र मोदींच्या वादळापुढे भाजपाच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत पतली झाली आणि काँग्रेसच्या वाड्यातले उरले-सुरले वतनदार देखील सोडून चालले आहेत. पंजाबचा सुभा मुळापासू हादरला आहे. कॅप्टन अमरिंदर यांना काँग्रेस श्रेष्ठींनी पदावरून दूर केलं. प्रदेशाध्क्ष नवजोतसिंग सिद्धूंनी पेढे वाटत भागडा केला. पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता पदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढचं संकट वाढवलं. सिद्धूंच्या सततच्या कटकटीमुळे अमरिंदर यांना दूर केलं. आता सिद्धूही गेले काँग्रेसच्या हाती काय उरलं?” असा सवाल शिवसेनेकडून विचारण्यात आला आहे.
शेतकऱ्याचं उभं पीक वाहून गेलं, अंत पाहू नका, पंचनामे नकोत, तात्काळ मदत द्या – राणा जगजितसिंह
दरम्यान, पक्षनेतृत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं अग्रलेखातून काँग्रेसला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “भाजपाकडे मंत्रीपदं वाटण्याची क्षमता आहे म्हणून लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणं म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे, त्यामुळे काँग्रेसचं काय होणार असा घोर लागलाय. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी सुरू असलेले उपचार चुकीचे आहेत का याचा विचार व्हायला हवा. काँग्रेसनं उसळी मारून उठावं, मैदानात यावं अशी लोकभावना आहे पण त्यासाठी काँघ्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष हवा”, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.
Read Also :
- अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठं नुकसान, पंचनामे होत राहतील, आधी शेतकऱ्यांना मदत करा – फडणवीस
- महापालिका निवडणुकीसाठी मनसेने कंबर कसली; ठाकरे पिता-पुत्र उद्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यावर
- प्रोटोकॉलप्रमाणे चिपी विमानतळाच उद्घाटन होणार; नारायण राणेंच नाव कितव्या क्रमांकावर?
- जातीयवादी पक्ष एकत्र आले तरी काँग्रेसला फरक पडणार नाही; भाजप-मनसे युतीवर पटोले सडकून टीका
- मराठवाड्यातील पूरस्थितीला फडणवीस सरकारची ‘जलयुक्त शिवार’ कारणीभूत; भाजपाने मात्र दावा फेटाळला