मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझी सांगाती या पुस्तकाचे सुधारीत प्रकाशन मंगळवारी पार पडले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्षपद सोडत असल्याचं वक्तव्य शरद पवार यांनी केल्याने अनेकांना धक्का बसला आहे. यावरून सध्या राज्यात राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आज राष्ट्रवादीची यावरून बैठक होत असून यात दोन प्रस्ताव मांडले.
हेही वाचा…अजित पवारांना धक्का : हवेली बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादीचा ‘सुपडा साप’
‘लोक माझे सांगती’ या राजकीय आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचा अनपेक्षित निर्णय जाहीर केला. याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. पवार साहेबांनी नवीन अध्यक्षाच्या निवडीसाठी समिती गठीत केली. या समितीची आज बैठक संपन्न झाली.
हेही वाचा…‘आता लोकांची खात्री पटली, राष्ट्रवादीने उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवली’
या बैठकीत सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला की, शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात येत आहे. पक्षाध्यपदी पवार साहेबांनीच राहावे अशी विनंती सर्वानुमते करण्यात येत आहे. हा ठराव पवार साहेबांची भेट घेऊन त्यांच्या समोर मांडण्यात येईल. त्यावर चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. देशाला, राज्याला, पक्षाला पवार साहेबांची गरज आहे. पक्षाचे आधारस्तंभ तुम्हीच आहात. त्यामुळे पवार साहेबच पक्षाध्यक्षपदी असावे, अशी सर्वांची भावना असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
READ ALSO :
हेही वाचा…“समितीने राजीनामा फेटाळ्यानंतर फटाके, मिठाई वाटत कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष”, शरद पवारांच्या भुमिकेकडे लक्ष ?
हेही वाचा…“राजकारणात अपघाताने काहीच घडत नाही”, राऊतांच्या ‘त्या’ ट्विटने राजकारणात काहुल माजलं
हेही वाचा…Breaking: शरद पवारांच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादी काँग्रेस समितीचा महत्त्वाचा निर्णय! कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
हेही वाचा…“मी पुन्हा येईन, तो कसा येतो, ते तुम्हाला….”, तापलेल्या राजकारणात फडणवीसांचं सुचक विधान
हेही वाचा…“राष्ट्रवादीचा अॅक्शन प्लॅन तयार, पुढचा अध्यक्ष ठरला, बैठकीत दोन प्रस्ताव ?”