मुंबई : शिवसेनेचा 19 जून रोजी 57 वा वर्धापन दिन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला. या वर्धापन दिनानिमित्ताने उद्धव ठाकरे यांनी प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना जोरदार पलटवार केला आहे. यावर आता शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले असून एकमेकांवर जोरदार टीका टिप्पणी सुरू असतांना भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याव आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं दिसून येत आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय ‘सचीन जोशी’ला इडीने का उचललं होतं? राऊतांचा सवाल
राष्ट्रवादी काॅंग्रेस आज गद्दार दिवस साजरा करीत आहे. एखाद्या पक्षातून दुसऱ्या पक्षात जाऊन कुणी सरकार बनवलं असेल तर ते पहिले आदिपुरूष शरद पवार आहेत. म्हणून आजचा गद्दार दिवस साजरा करण्याच्या ऐवजी त्यांनी त्यांचा वाढदिवस साजरा केला असता तर बरं वाटलं असतं. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी भाकरी फिरवून परत आले. परंतु ते गद्दारीचे आदिपुरूष आहेत. असा खोचक टोणमाही त्यांनी लगावला.
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायची हिमंत आमच्यात, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर आम्हाला जेलमध्ये टाकावं”, सुप्रिया सुळे
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या टीकेवर खासदार संजय राऊत यांनी देखील पलटवार केलाय. एकनाथ शिंदे यांना ईडीने फक्त डोळे वटारले तरी ते पळून दिल्लीला जातायेत त्यानंतर त्यांनी पक्षांतर केले त्यांच्याकडील दोन माणसांना फक्त उचलून घेऊन गेले त्यानंतरची संपूर्ण कथा महाराष्ट्राला माहिती आहे त्यामुळेच आजचा दिवस गद्दार दिवस म्हणून साजरा करा असं मी वारंवार म्हणतोय आम्हाला देखील नोटीस आल्या परंतु आम्ही कोणालाही न घाबरता तुरुंगात गेलो परंतु आम्ही गद्दारी केली नाही ज्यांना गद्दारी करायची होती त्यांनी केली परंतु आम्ही आमचा पक्ष सोडला नाही असं देखील संजय राऊत आणि म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही”, ठाकरेंच्या विराट मोर्चावर शिंदेंची प्रतिक्रिया
हेही वाचा…“गुलाबराव पाटलांना ५०० रुपयांचा दंड, एकनाथ खडसेंवर केलेले ते आरोप पाटलांना भोवले”
हेही वाचा…ठाकरेंनी बोलवलेल्या बैठकीत ५ ते ६ माजी नगरसेवक गैरहजर, चर्चांना उधाण
हेही वाचा…ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…“ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार