मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केल्यानंतर दिल्लीत आरक्षणावर हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तात्काळ दिल्लीला रवाना झाले आहेत. दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेऊन मराठा आरक्षणावर चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आता काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार
भाजपने २०१४ मध्ये राज्यातील मराठा, धनगर गोवारी, हलबा अश्या विविध समाजांना आरक्षणाचे गाजर दाखविले होते पण त्यांना आता १० वर्ष पुर्ण होत असतानासुद्धा ते आश्वासनं पुर्ण करू शकलेले नाहीत, यामुळे या सर्व समाजात या सरकारविरूद्ध मोठ्या प्रमाणात आक्रोश खदखदत आहेत. त्यामुळे आता आरक्षणाचे प्रश्न तीव्र होत चालले असल्याची प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.
हेही वाचा…“तर अजित पवारांना कारखान्यात घुसू देणार नाही,” बारामतीतच अजित पवारांना घातली बंदी, दिला इशारा
दोन समाजात भांडण लावून तेढ निर्माण करण्याचे काम भाजपने केलेलं आहे. त्याचा हा परिणाम आहे. जरांगे पाटलांनी आज ज्याप्रमाणे या सरकारवर ताशेरे ओढलेले आहे, त्यामुळे सामान्य माणूस आणि समाजातील लाखो लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत चाललेला आहे. ही समाजाची जनभावना या सरकारला समजत नसेल तर हे सरकार आंधळ, बहिरं बधीर झालेलं सरकार आहे. असा घणाघात पटोले यांनी केला.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे गटाची उद्या सत्व परिक्षा, नार्वेकर उद्या मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन