मुंबई : मनसेकडून दहीहंडी उत्सव साजरा करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली जात आहे. काल (३० ऑगस्ट) ठाण्यात दहीहंडी साजरी करण्यासाठी मंडप आणि स्टेज उभारणीचे काम सुरू असताना पोलिसांनी त्यावर कारवाई करून, काम बंद पाडून, कोविड नियमांचं उल्लंघन केल्यामुळे मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर मनसेचे सरचीटणीस संदीप देशपांडे यांनी, “दादरमध्ये दहीहंडी साजरी करू”, असा इशारा दिला.
“यांची बाहेर जायला फाटते, त्यात आमचा काय दोष?” निर्बंधांवरून राज ठाकरेंची जळजळीत टीका
या पार्श्वभूमीवर, मनसैनिकांकडून मुंबईत अनेक ठिकाणी दहीहंडी फोडून, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून, निषेध नोंदवण्यात आला. ठाण्यातील वर्तकनगरमध्ये लक्ष्मी पार्क चौकात, मनविसेचे जिल्हाप्रमुख संदिप पाचंगे आणि मनसैनिकांनी, दहिहंडी मानवी मनोरे लावून फोडली आणि सरकार विरोधी घोषणाबाजी केली, तर नौपाडामधल्या मनसेच्या मुख्य कार्यालयात देखील मनसैनिकांनी दहीहंडी फोडली. तसेच, मलबार हिल, वरळी, भांडूप, साकीनाका इथेही मनसेने हंडी फोडून निर्बंधांचा निषेध केला.
ठाणे महापालिका अधिकाऱ्यावर अनधिकृत फेरीवाल्याचा जीवघेणा हल्ला; मनसे आक्रमक
दरम्यान, काल सकाळी नौपाडा इथल्या भगवती मैदानात, दहीहंडी साजरी करण्याचा इशारा देत मनसेने हंडीचे आयोजन केले होते. यावर कारवाई करण्यासाठी आलेल्या पोलीसांनी मंडप काढायला सुरुवात केल्यांनतर मनसेचे ठाणे जिल्हा प्रमुख अविनाश जाधव, शहर प्रमुख रविंद्र मोरे, संघटक पुष्कर विचारे हे उपोषणाला बसले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र मंडपाचे सामान नेत असताना पुन्हा मनसैनिकांनी टेम्पो अडवला. तेव्हा, ठाण्याच्या पोलीस उपायुक्तांनी मनसैनिकांना नियंमांचे पालन करावे असे आवाहन केले.
मुंबईकरांना तिसऱ्या लाटेचा धोका? इमारत सील होणार; वाचा महापालिका प्रशासनाची नवी नियमावली…
त्यामुळे, सण साजरे करण्यावरून सरकार आणि मनसेमध्ये चांगलीच जुंपली असल्याचे दिसून येत आहे. दुसरीकडे, काल भाजपकडून देखील राज्यातली मंदिरे दीर्घकाळापासून बंद आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे येत्या आठ दिवसांत खुली करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेत, राज्यात विविध ठिकाणी ‘शंखनाद’ आणि ‘घंटानाद’ आंदोलने करण्यात आली. भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे राज्यव्यापी आंदोलन सुरु होते.
Read Also :
- औरंगाबादच्या कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळली; अनेक वाहनं दरडीखाली
- रासपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची माळ पुन्हा महादेव जानकारांच्या गळ्यात
- “एक ना एक दिवस आमचेही दिल्लीत दिवस येतील”, ईडीच्या छापेमारीवरून संजय राऊतांचा इशारा
- भाजप आमदारांचा ५०० कोटींचा घोटाळा, भावना गवळींकडून ईडी चौकशीची मागणी
- महाविकास आघाडी सरकारची ही ‘घोटाळा इलेव्हन’, किरीट सोमय्यांकडून ११ नावे जाहीर