मुंबई : शिवसेनेत मोठी फुट पडल्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: मैदानात उतरून पक्ष संघटना बळकट करण्याचा चंग बांधला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंनी अलिकडेच सिंधुदूर्ग -रत्नागिरी दौरा केला. त्यानंतर मुंबई आणि मराठवाड्याचा दौरा नियोजित आहे. गद्दारांना निवडणुकीत कशाही पद्धतीने हरवायचं असं सांगत ठाकरे आता महाराष्ट्र भर फिरू लागले आहेत. यातच आता पुढील लोकसभेच्या निवडणुकीसाठी ठाकरेंनी ११ शिलेदारांचं नाव जवळपास निश्चित केलं आहे.
हेही वाचा…“..म्हणून काँग्रेस पक्ष सोडला”, बाबा सिद्दीकींनी सांगितलं कारण, ‘त्या’ पक्षाची ताकद वाढवणार
एका बाजूला महाविकास आघाडीत लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला शिवसेना ठाकरे गटाने आपले ११ उमेदवार जाहीर करून आघाडी घेतली आहे. यामध्ये भाऊसाहेब वाकचौरे, नरेंद्र खेडेकर, संजय दिना पाटील, अनंत गिते, विनायक राऊत, अरविंद सावंत, अमोल किर्तीकर, चंद्रकांत खैरे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव आणि राजन विचारे यांची उमेदवारी पक्की मानली जात आहे.
हेही वाचा…शिवसेना पक्ष सोडा, पक्षांतर करा, नाहीतर तुरूंगात जा,” ठाकरे गटाच्या माजी मंत्र्याला शिंदे गटाच्या धमक्या
लोकसभा निवडणुकीकरिता अद्यापही जागा वाटप झाले नसून राज्यात महाविकास आघाडी विरूद्ध महायुती असा सामाना अटळ आहे. यातच राज्यात झालेल्या पक्ष फुटीमुळे राज्यातील राजकीय चित्र बदललेलं आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार ? त्याकडे सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तीन चाकी सरकारची कामगिरी छान, आज झाला बिहार उद्या होईल अफगाणिस्तान “
हेही वाचा…शिरूर लोकसभेसाठी अमोल कोल्हे, तर हडपसर विधानसभेत जगताप ? शरद पवार गटाने कंबर कसली
हेही वाचा…“मोदींचा जन्म ओबीसी समाजात नाही तर तेली समाजात झाला,” राहुल गांधीचं वक्तव्य, भाजपा राज्यभर आंदोलन करणार
हेही वाचा…कोण आहे मॉरिस नरोन्हा ? फेसबुक लाईव्हमध्येच ठाकरे गटाच्या नेत्याला संपवलं, घटनेचा थरारक CCTV व्हिडीओ
हेही वाचा…महाराष्ट्र हादरलं…! ठाकरे गटाच्या नेत्याची गोळ्या झाडून ह’त्या’, आरोपींनीही स्वत: ला संपवलं