पुणे : अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकरांनी भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. तब्बल २८ वर्षाचा भाजपचा हा बाल्लेकिल्ला रवींद्र धंगेकरांनी उद्धवस्त केला असून भाजपला हा मोठा धक्का बसला आहे. खास करून कसबा पेठ पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे कॅबिनेट मंत्री पुण्यात ठाण मांडून बसले होते. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रचार केला होता. त्यामुळे या पोटनिवडणुकीचा परिणाम आगामी होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये होण्याची शक्यता आहे. यावर आता रविंद्र धेंगकरांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा..तर संजय राऊतांना कारावासाची शिक्षा होऊ शकते, राऊतांच्या वक्तव्यावर वकील ‘असीम सरोदे’ यांचं सुचक विधान
महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना कसबा पेठ पोटनिवडणुकीत ७३ १७४ मत पडली आहेत. तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना या निवडणुकीत 62244 मत पडली आहेत. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने यांच्यावर तब्बल ११ हजार ४० मतांनी विजय मिळवला आहे. तर अपक्ष उमेदवारांनी घेतलेल्या मताचा फटका हेमंत रासने यांना बसला आहे.
हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
“पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्विकारलं नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर आहे.” असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं आहे. तसेच भाजपाकडे हा शेवटचा आधार होता झिंगण्यासाठी तो म्हणजे हिंदुत्व. शेवटची शक्ती म्हणून त्यांनी हिंदुत्वाचं कार्ड काढलं होतं. पण मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं हिंदुत्व होतं. मी सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन जाणारा आहे. असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत
“कसबा मतदारसंघात दरवेळी तिरंगी लढत व्हायची यंदा पहिल्यांदाच दोन जणांमध्ये थेट लढत झाली. मतदारांपर्यंत पोहचण्यात मी अपयशी ठरलो. मला या निवडणुकीच्या निकालाचं आत्मचिंतन करून कुठे कमी पडलो हे पाहावे लागेल. कुठलीही निवडणूक नेते गांभीर्याने घेत असतात. निकाल माझ्यासाठी धक्कादायक आहे, जिथे आम्ही कमी पडलो तिथे काम करू. – हेमंत रासने, भाजपाचे उमेदवार २००९ पासून हा मतदारसंघ संमिश्र झाला. त्यानंतर भाजपाने तो तीनदा जिंकला असला, तरी त्या प्रत्येक वेळी किमान तिरंगी लढत होती. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर पहिल्यांदा इथे थेट लढत झाली. जनतेचा आणि देवाचा आशीर्वाद मिळाला आहे. गेल्या पराभवावेळी रवींद्र धंगेकरांनी म्हटलं होतं की ते नक्कीच निवडून येतील. माझ्या मनात अजिबात धाकधूक नव्हती. आम्ही घरोघरी जाऊन केलेल्या प्रचाराचं हे फळ आहे. मविआनं टाकलेला विश्वास सार्थ झाला आहे”. अशी प्रतिक्रिया हेमंत रासने यांनी दिली आहे.
Read also
- हेही वाचा.“भाजपचा 28 वर्षाचा बाल्लेकिल्ला आघाडीकडून उद्धवस्त,” धंगेकरांचा रासनेंवर 11 हजार 40 मतांनी विजय
- हेही वाचा..“कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..““कसब्यात ‘रविंद्र धंगेकर’ तर चिंचवडमध्ये ‘अश्विनी जगताप’ आघाडीवर”, पोटनिवडणुकांचा कल हाती
- हेही वाचा..“गुरूवारी कोर्टात ठाकरेंना शिंदेंकडून वकिल धक्का देणार, महेश जेठमलानी मनिंदर सिंग यांचा युक्तिवाद गेम चेंजर ठरणार
- हेही वाचा..राऊतांच्या विरोधात हक्कभंगाची समिती, भाजपसह, काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा समावेश, ४८ तासांची मुदत