मुंबई : राज्यातील पहाटेच्या शपथविधीबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौप्यस्फोट केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील भाष्य करत या गोष्टीला दुजोरा दिला होता. याच शपथविधीबाबत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना वारंवार विचारलं जातं. त्यातच आता त्यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत एक सुचक विधान केलं आहे.
हेही वाचा..“बाळाला उराशी धरून काल हंबरडा फोडला”, आज एकनाथ शिंदेंनी थेट निर्णय घेतला
एका मुलाखतीत पहाटेच्या शपथविधीबाबत विचारले असता अजित पवार यांनी यावर भाष्य केलं आहे. “मी याबाबत आत्ताच बोलणार नाही, मला जेव्हा वाटेल तेव्हा यावर बोलणार, आत्ता हा शब्द निघून जाईल आणि मी बोलेने असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच, ज्यावेळी मला वाटेल आत्मचरित्र लिहावं, त्यावेळी मी लिहीन. आत्मचरित्रात सगळ्या गोष्टी लिहीन. सुरूवातीपासूनच सगळं लिहीन, ते वाचल्यावर कुणाला काय वाटेल, ते वाटेल पण मी सगळं खंर खंर लिहिन. मला त्याची किमंत मोजावी लागली तरी मी ते लिहिन, खरं सांगेन. असंही अजित पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सांगण्यावरून पहाटेचा शपथविधी झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्याबाबत शरद पवारांनी यावर सुचक विधान केलं होतं. त्यावर बोलतांना अजित पवार म्हणाले की, मी कुणाशी बोलावे, तो माझा अधिकार आहे, असं त्यांनी म्हटलं. अजित पवार पुणे शिक्षण मंडळ कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
Read also
- हेही वाचा..भाजपच्या बाल्लेकिल्ल्याला धक्का बसणार, कसब्यात काॅंग्रेसचा हात देणार भाजपला मात ?
- हेही वाचा..कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला केला ढिल्ला, 500 कार्यकर्त्यांसह माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”
- हेही वाचा..“.“तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजाचं, पुण्याला फुलेंच तर नागपुरला आंबेडकरांच नाव द्या,” खासदाराची मागणी
- हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले