पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी २६ फेब्रुवारी मतदान झालं असून त्याचा निकाल उद्या २ मार्चला लागणार आहे. कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने तर महाविकास आघाडीकडून रवींद्र धंगेकर यांच्यात लढत आहेत. यातच एका संस्थेच्या एक्झिट पोलनुसार कसब्यात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आता एकच चर्चा रंगली आहे.
हेही वाचा..“विरोधकांचं कडबोळं बांधण्याचा प्रयत्न केला, तरी २०२४ साली मोदीच येणार”, भाजपने डिवचलं
पुण्यातील या दोन्ही पोटनिवडणुकीसंदर्भात द स्ट्रेलेमा या संस्थेने आपला एक्झिट पोल प्रसिद्ध केला आहे. त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ७४,४२८ इतकं मत तर भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांना ५९,३५१ मत पडण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे. या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा जवळपास १५,०७७ मतांनी विजय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हेही वाचा..“तेव्हाच तुम्हाला महाराज आठवतात का?” महाराजांच्या अरबी समु्द्रतील पुतळ्यावरून अजित पवारांनी सरकार घेरलं
दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अश्विनी जगताप यांना १,२५,३५४ मत महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९३,००३ तर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ६०,१७३ मत पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अश्विनी जगताप या पोटनिवडणुकीत ३२,३५१ मतांनी विजय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हेही वाचा..“..तर राजकारण सोडून देईन” फडणवीसांचा ‘अनाजी पंत’ उल्लेख करत भास्कर जाधवांनी दिलं आवाहन
दरम्यान, या दोन्ही पोटनिवडणुकांचा निकाल उद्या म्हणजे ०२ मार्चला लागणार आहे. या पोटनिवडणुकांच्या प्रचारासाठी राज्यातील प्रमुख नेते पुण्यात दाखल झाले होते. यातच आगामी काही काळात राज्यात महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे या निकालाचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम या निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
Read also
- हेही वाचा..कोकणात भाजपने शेकापचा बाल्लेकिल्ला केला ढिल्ला, 500 कार्यकर्त्यांसह माजी आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश
- हेही वाचा..“एकनाथ शिंदेंचा संजय राऊतांना मोठा दणका, ‘या’ पदावरून हटवण्याच्या हालचाली सुरू”
- हेही वाचा..“.“तर मुंबईला छत्रपती शिवाजी महाराजाचं, पुण्याला फुलेंच तर नागपुरला आंबेडकरांच नाव द्या,” खासदाराची मागणी
- हेही वाचा..“गिरीश महाजन राहिले असते तर त्या वळूला पकडलचं असतं,” भुजबळ मुद्यांवर बोलून गेले
- हेही वाचा..“बाळाला उराशी धरून काल हंबरडा फोडला”, आज एकनाथ शिंदेंनी थेट निर्णय घेतला