मुंबई : आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक नेते पक्ष प्रवेश करताना दिसत आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेनेचे अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यातच आता उद्धव ठाकरे यांच्या गटाला चांगली बातमी समोर येत आहे. आज माजी आमदार मधुशेठ ठाकुर यांचे चिरंजीव आमिर ठाकूर,बंजारा समाजाचे नेते अनिल राठोड यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश झाला.
“आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी
माजी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज माजी आमदार मधुशेठ ठाकुर यांचे चिरंजीव आमिर ठाकूर यांनी हाताल शिवबंधन बांधले. तर संत सेवालाल महाराज यांचे पाचवे वंशज व माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव अनील गजाधर राठोड यांनी देखील उद्धव ठाकरेंच्या उपस्थित सेनेत प्रवेश केला.
“उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला”
पक्ष प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले की, शिवसेना फुटण्यापेक्षा जास्त वाढली आहे. रोज दिग्गज आणि साधी माणसं शिवसेनेते येत आहेत. वेगवेगळ्या विचारांची माणसं येत आहेत. त्यामुळे शिवसेना होती त्यापेक्षा अधिक मजबुत होत आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
संत सेवालाल महाराज (पोहरादेवी) यांचे पाचवे वंशज व माजी आमदार स्व. गजाधर राठोड यांचे चिरंजीव मा. श्री. अनील गजाधर राठोड यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पक्षप्रवेश झाला. pic.twitter.com/1xEQt81izy
— ShivSena – शिवसेना (@ShivSena) December 3, 2022
Read also
- “आता एकत्र आलं पाहिजे, कारण मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटताहेत”; उद्धव ठाकरे
- “सावध रहा, त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करताहेत”; जंयत पाटील
- “आता बेळगावसाठी मुख्यमंत्री नवस का करत नाही”; ठाकरेंचा शिंदेंना टोला
- “बच्चू कडूंची अवस्था म्हणजे, नोकरीवर आहे, पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं”
- “उगाचच राग राग करण्याऐवजी संजय राऊतांनी थेट खासदारकीचा राजीनामा द्यावा”