मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सेनेविरोधात बंड केल्यानंतर त्यांना 10 अपक्ष आमदारांनी देखील पाठिंबा जाहीर केला होता. यामध्ये राज्यमंत्रीपद सोडून आलेले बच्चू कडू यांचा देखील समावेश होता. मात्र शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात बच्चू कडू यांना स्थान देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे बच्चू कडू यांची नाराजी त्यांनी कित्येक वेळा जाहीर पणे सांगितली होती. यातच आता हिवाळी अधिवेशनापुर्वी मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्याचा विस्तार होणार आहे. त्याकडे सगळ्याचं लक्ष्य लागून राहिलं आहे. यावरून राष्ट्रवादीने बच्चू कडू यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’
राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बच्चू कडू यांच्यावर खोचक टिप्पणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या बच्चू कडू यांची अवस्था सरकारी नोकरीवर असलेल्या अधिकाऱ्यासारखी झाली आहे. नोकरीवर आहे, पण पगार चालू आहे. पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर घरी पाठवलं आहे. असा टोला बच्चू कडू यांना सुरज चव्हाण यांनी हाणला आहे.
त्याआधी शिंदे- फडणवीस सरकारचा पहिला हिवाळी अधिवेशन नागपुर याठिकाणी 19 डिसेंबर पासून होण्याची शक्यता आहे. त्यासाठी नागपुर येथील तब्बल 46 बंगल्यांची डागडुजी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे अधिवेशनापुर्वी शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये आता कुणाला संधी मिळणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलं आहे. कारण प्रत्येक बंडखोर आमदार मंत्रीपदाची आस लावून बसला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस यांना आमदारांना समजवण्यास कठिण जाण्याची शक्यता आहे.
Read also
- “उगाचच राग राग करण्याऐवजी संजय राऊतांनी थेट खासदारकीचा राजीनामा द्यावा”
- “आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी
- “उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला”
- “तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं”; उदयन राजेंचा आक्रमक पवित्रा
- “गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत