मुंबई : कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद दिवसेदिवस चिघळत चालला आहे. आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापुर आणि अक्कलकोट मध्ये कर्नाटक भवन बांधण्याची घोषणा केली आहे. तसेच महाराष्ट्रातील मंत्र्यांना कर्नाटक न येण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रखरशब्दात टिका केली आहे.
“गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत
सीमावादाच्या मुद्यावर कर्नाटकचे मुख्यमंत्री आक्रमक होत असेल तर आमचे मुख्यमंत्री गुवाहाटीवरून आल्यानंतर शांत का झाले आहेत ? बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री गुवाहाटीला का जात नाहीत ? बेळगाव महाराष्ट्रात यावं यासाठी नवस का केला जात नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे. आज सेवालाल महाराजांचे वंशज अनिल राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
भाजपाच्या एका बड्या नेत्याच्या मदतीने विकास ढाकणे यांना पुण्याची ‘सुभेदारी’
साधारणता प्रत्येक राज्यात इतर राज्यांचे भवन असतात. मात्र, आपलं आणि कर्नाटकचं नातं काय आहे, हे अजून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून ऐकायला आलेलं नाही. महाराष्ट्रात ते कर्नाटक भवन बांधत असतील, तर आजच मी वृत्तपत्रात वाचले की, महाराष्ट्राच्या मंत्र्यांना कर्नाटकात येण्यास मज्जाव केला आहे. याबद्दल मुख्यमंत्री एक शब्दही बोलले नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, अलिकडेच महाराष्ट्रातील जत तालुक्यातील जवळपास 40 गावांवर कर्नाटक सरकारने दावा ठोकला. त्यानंतर दोन्ही राज्यात सध्या तणावाचं वातावरण तयार झालं आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात आल्या असून त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Read also
- “बच्चू कडूंची अवस्था म्हणजे, नोकरीवर आहे, पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं”
- “उगाचच राग राग करण्याऐवजी संजय राऊतांनी थेट खासदारकीचा राजीनामा द्यावा”
- “आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी
- “उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला”
- “तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं”; उदयन राजेंचा आक्रमक पवित्रा