सोलापुर : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयाचे अवमूल्यन होत आहे. त्याचा फटका थेट सर्वसामान्यांच्या खिशाला बसत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात उद्योगधंदे महाराष्ट्राबाहेर गेले. त्यामुळे सुमारे ४ लाख तरुणांच्या हातचा रोजगार गेला. सामान्य माणूस या सरकारबाबत पूनर्विचार करण्याच्या भूमिकेत आहेत. कष्ट करणाऱ्या माणसाकडे या सरकारचे दुर्लक्ष आहे. धनदांडग्या आणि मोठ्या उद्योगपतींसाठीच हे सरकार काम करत आहे. याबाबत सर्वसामान्य माणसाने आता डोळस व्हायला पाहिजे. अस मतं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. एक तास राष्ट्रवादीसाठी या उपक्रमांतर्गत त्यांनी आज उरूण-इस्लामपुर शहारात कार्यकर्त्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
“तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं”; उदयन राजेंचा आक्रमक पवित्रा
आजपर्यंत या देशात सर्व धर्माची लोकं गुण्यागोविंदाने नांदली. सर्वधर्म समभाव हा मंत्र जोपासला. छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रबोधनाने आपण इथल्या रूढींना हद्दपार केले. त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करत आहेत. समाजात संभ्रम निर्माण केला जात आहे. आपण या सर्वाचा बारकाईने विचार करायला पाहिजे. आपल्याला मूळ समस्यांवर लक्ष ठेवायला हवे. या समस्यांवर येत्या काळात मात करायची आहे आणि एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
“गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत
गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडत आहे. या सरकारला स्वतःच्या अस्तित्वावरच विश्वास नाही, म्हणून निवडणूक घेतली जात नाही. वाटेल ते निर्णय घेत अंदाधुंद कारभार सुरू आहे. हा लोकशाहीच्या मुळ तत्त्वांवर घाला घालण्याचा प्रकार आहे. केंद्रातील निती आयोगाप्रमाणे महाराष्ट्रात ‘मैत्री’ची स्थापना केली आहे. या समितीच्या उपाध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी नजिकचे संबंध असलेल्या बिल्डरला बसविले आहे. येणाऱ्या अधिवेशनात आम्ही याचा समाचार घेऊच. मात्र एकाधिकारशाही आणि झुंडशाही कशी सुरू आहे ते यातून दिसते. या हुकूमशाही विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आवाज उठवणार आहेच. महाराष्ट्रात असे प्रकार आम्ही कदापि सहन करणार नाही. याविरोधात लढा देण्यासाठी सामान्य माणूस आमची ताकद वाढवेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
Read also
- “आता बेळगावसाठी मुख्यमंत्री नवस का करत नाही”; ठाकरेंचा शिंदेंना टोला
- “बच्चू कडूंची अवस्था म्हणजे, नोकरीवर आहे, पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं”
- “उगाचच राग राग करण्याऐवजी संजय राऊतांनी थेट खासदारकीचा राजीनामा द्यावा”
- “आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी
- “उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला”