मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांबाबत जर कोणी वक्तव्य करीत असतील तर आपण शांत कसे बसायचं ? विकृतांच्या वक्तव्यावर पांघरून घालणाऱ्यांनाही लाज वाटली पाहिजे. असं म्हणत खासदार उदयन राजे यांनी राज्यातील राजकीय नेत्यांवर प्रखरशब्दात हल्लाबोल केला. यावर आता उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“उच्च न्यायालयाने शिंदे-फडणवीस सरकारच्या सुडाच्या राजकारणाला लगाम लावला”
सध्या राज्यात आपण सर्व महाराष्ट्र प्रेमींनी एकत्र आलं पाहिजे. आगामी काळात सुद्धा स्वाभिमानी महाराष्ट्र उभा करण्याची गरज आहे. कारण, मिधें सरकार खुर्चीसाठी दिल्लीश्वरांचे पाय चाटत असेल तर अभिमान आणि स्वाभिमानाची त्यांच्याकडून अपेक्षा न केलेली बरी, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर केला आहे.
“तर राज्यपालांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं”; उदयन राजेंचा आक्रमक पवित्रा
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, उदयनराजेंचं मी मनापासून धन्यवाद मानतो. गेल्यावेळी सांगितलं होतं की, भाजपतील छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. त्याबाबत सुरूवात झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील गद्दारीची तुलना छत्रपतींच्या आग्र्यातील सुटकेशी केली जाते. अजूनही ते मंत्री राहत असतील तर महाराष्ट्र काय आहे, हे दाखवण्याची वेळ आली आहे. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
“गद्दारांना आई-बहिणीवरून शिव्या येतात, मग राज्यपाल, मंत्र्यांना का देत नाही”; संजय राऊत
दरम्यान, आज रायगडावर उदयनराजे यांनी शिवरायांचं समाधीस्थळाचं दर्शन घेऊन त्यांनी राज्यपालांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केला. तसेच जर राज्यपाल आज या गडावर असते तर त्यांना टकमक टोकावरून फेकून दिलं असतं असा प्रत्यक्ष टोलाही त्यांनी राज्यपालांना लगावला.
Read also
- “सावध रहा, त्या बुरसट रूढींना पुन्हा परत आणण्याचा काही प्रवृत्ती प्रयत्न करताहेत”; जंयत पाटील
- “आता बेळगावसाठी मुख्यमंत्री नवस का करत नाही”; ठाकरेंचा शिंदेंना टोला
- “बच्चू कडूंची अवस्था म्हणजे, नोकरीवर आहे, पण साहेबांनी सक्तीच्या रजेवर पाठवलं”
- “उगाचच राग राग करण्याऐवजी संजय राऊतांनी थेट खासदारकीचा राजीनामा द्यावा”
- “आजपासून आम्ही उद्धव ठाकरे गटात सामील”; बुलढाण्यात बंजारा समाज ठाकरेंच्या पाठीशी