नाशिक : वंचित बहुजन युवा आघाडीने नाशकात सरकारच्या विरोधात एल्गार मोर्चा काढला आहे. या मोर्चाचे नेतृत्व सुजात आंबेडकरांनी केलं आहे. कंत्राटी भरती रद्द करावी, खाजगीकरण बंद करावे, जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय रद्द करावा, पेपरफुटी संदर्भात कडक कायदा करावा या मागण्यासाठी हा एल्गार मोर्चा काढण्यात आला आहे.
हेही वाचा…“तुम्हाला संभाळता येत नसेल तर राज्याचे गृहखातं माझ्याकडे द्या”, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना जोरदार टोला
नाशिकच्या शालिमार येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरूवात करण्यात आली आहे. कंत्राटी भरती म्हणजे सरकार म्हणत आहे की, आम्हाला हे सरकार चालवता येत नाही, म्हणून आम्ही हे सरकार भाड्याने चालवायला देत आहोत. राज्यात १२ ते २० कुटुंबांनी राज्यातील पाण्यावर ताबा ठेवला आहे. या जोरावर त्यांनी साखर कारखाना, शेती उद्योग यावर ताबा ठेवत पैसा खिशात घातला असल्याचा हल्लाबोल सुजात आंबेडकर यांनी केला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचा ‘हा’ माजी आमदार भाजपमध्ये दाखल, काका-पुतण्याला मोठा फटका
दरम्यान, यावेळी त्यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करणे, याचा अर्थ तुम्ही गोरगरिब, वंचित नागरिकांकडून त्यांचा हक्क काढून घेत आहे. तर स्पर्धा परिक्षेसाठी राजस्थानच्या धर्तीवर वन टाईन रजिस्ट्रिेशन सिस्टिम असावी आणि पेपर फुटीविरोधात कडक कायदा असावा अशीही मागणी करण्यात आलीय.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेत महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? आव्हाडांनी सांगितली दिल्लीच्या राजकीय सट्टा बाजारातली बातमी
हेही वाचा…दिशा सालियान प्रकरणी याचिकाकर्त्यांना ठाकरेंकडून ५० कोटींची ऑफर, नितेश राणेंचा गंभीर आरोप
हेही वाचा…“यंदा दिवाळीत कुणालाही भेटणार नाही ?” अजित पवारांनी ‘या’ कारणांमुळे घेतला मोठा निर्णय
हेही वाचा…“बीआरएसचा बडा नेता शरद पवार गटात दाखल, तर माजी आमदाराला शरद पवार गटातच लागली मोठी लॉटरी”
हेही वाचा…“आदित्य ठाकरेंचं एक ट्विट, अन् रस्ता घोटाळ्यातील कंत्राटदाराला पालिकेने दिला नारळ!