मुंबई : राज्यातील दुसरी लाट संपूर्णपणे ओसरली असून, बाधित रुग्णांच्या संख्येत देखील कमालीची घट दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मठ निर्णय घेतला असून, पुढील आठवड्यापासून राज्यातला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एसईबीसी आणि ईएसबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय!
या संदर्भातील अहवाल अंमबजावणीचा अहवाल टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांना पाठवला असून, या आठवड्यात टास्क फोर्सच्या सदस्यांची, मुख्यमंत्र्यांसोबत अहवालावर चर्चा होऊन, मग यावरचा अंतिम निर्णय होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सूत्र : वसुलीचे पैसे घेणारे ‘नंबर वन’ कोण? वाझेने जबाबात केला मोठा खुलासा- ईडी
दरम्यान, या महाराष्ट्र अनलॉकला, राज्य सरकार ‘ओपनिंग अप’ हा मंत्र अवलंबणार असल्याची माहिती समोर येत आहे. यात वेळ वाढवण्याबरोबरच, उपस्थितांची मर्यादाही शिथील केली जाणार आहे. लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांना यात प्राधान्य दिलं जाणार आहे. मात्र, सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय लगेच घेतला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
“हो! पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय हे खरं आहे”
तसेच, पहिल्या टप्प्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडण्यासाठी काही सवलती जाहीर केल्या जातील. यात, रेस्टॉरंटसाठी सुरु ठेवण्याची वेळ रा. १० पर्यंत ठेवली जाणार असून, उपस्थितीची ५०%ची मर्यादाही काही प्रमाणात शिथील केली जाईल, अशी शक्यता आहे. मात्र, त्यासाठी या आस्थापनांमधील सर्व कर्मचाऱ्यांचं लसीकरण झालेलं असणं गरजेचं आहे, सोबतच लसीकरण झालेल्याच ग्राहकांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश देण्यात प्राधान्य देण्यात येणार आहे, असा विचार सुरू आहे. दुकाने सुरू ठेवण्याची वेळही वाढवून दिली जाणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे.
Read Also :
- गृहमंत्री अमित शहांचा दौरा: दहा ते दुपारी एक दरम्यान दारे खिडक्या बंद करण्याचे पोलिसांचे आदेश
- नाशिकच्या हाय सिक्युरिटी असलेल्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा चोरीला
- “त्यांचेच कौरव-पांडव, अंगणही त्यांचंच आणि महाभारतही तिकडचंच, ते त्यांनाच लखलाभ”, काँग्रेसचा भाजपला टोला
- …म्हणून तुम्ही दिलेले राजीनामे, मी नामंजूर करते, पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद
- “मोठा नेता नेहमीच त्याग करत असतो, मंत्रिपदाची मागणी, हे मुंडे साहेबांचे संस्कार नाहीत.”