अहमदाबाद: गुजरातच्या अहमदाबादमधील वेजलपूर इथल्या उचंच उंच इमारतींमध्ये राहणारे स्थानिक रहिवासी सध्या पोलिसांच्या आदेशाने चक्रावून गेले होते. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात अतिरिक्त सहकार विभागाची जबादारी मिळालेले गृहमंत्री अमित शहा हे गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामध्ये पोलीस आदेशानुसार घराचे दरवाजे-खिडक्या बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलेलं होत. आणि यामध्येच एका महिलेने पोलिसांसोबत काही गोष्टींबाबत खटकल्याने थेट पत्राद्वारे या सर्व गोष्टींचा निषेध व्यक्त केला आहे.
हे पण वाचा, अमित शाह हे कायद्यापेक्षा मोठे नाहीत. त्यांचे नाव घेऊन भाजपा नेत्यांनी धमक्या देऊ नयेत – मलिक
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या तीनदिवसीय अहमदाबाद भेटीच्या पार्शवभूमीवर हा आदेश काढण्यात आलेला आहे. अमित शहा शनिवारीच अहमदाबादला पोहोचले आहेत. भेटीदरम्यान ते शहरातल्या अनेक योजनांच उदघाटन करणार येणार होते. यामध्ये वेजलपूर भागातील सामूहिक भवनाच्या उद्धघाटनाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता. याच सामुदायिक भवनाच्या परिसरात असणाऱ्या उंच सोसायट्यांच्या चेअरमनांना स्थानिक पोलिसांनी ९ जुलै रोजी जरी केलेल्या आदेशानुसार ११ जुलै रोजी सकाळी १० ते दुपारी १ दरम्यान आपापल्या घरांचे दरवाजे, खिडक्या बंद ठेवण्याचे आदेश जारी केले होते.
हे पण वाचा, “जरंडेश्वर संपवण्याचा प्रयत्न केला तर ईडीला आमचा हिसका दाखवू”; शशिकांत शिंदेचा ईडीला इशारा
हे पण वाचा, धक्कादायक! खडसेंना क्लीन चीट देणाऱ्या झोटिंग समितीचा अहवाल गायब?
यावरून एका महिलेने थेट पत्र लिहून या दौऱ्याबाबतीत सरकारवर प्रश्नांची सरबत्ती उठवली आहे. आता सरकार आमच्या घरात आम्ही कसे राहायचे हे देखील ठरवणार का असा संतप्त सवाल महिले उपस्थित केला आहे. आज तुम्ही येत आहेत म्हणून दार खिडक्या बंद करायला लावली, उद्या आम्ही काय खायचे काय नाही हे देखील तुम्हीच ठरवणार का? असा प्रश्न देखील विचारला आहे. आज मंत्री येत आहेत म्हणून दार खिडक्या बंद करायला लावत आहेत मात्र त्यांना मी एका गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छिते की तुम्ही आमदार, खासदार, मंत्री हे जनतेचे सेवक आहात. आम्ही तुम्हाला उत्तर देण्यास बांधील नाहीत तर तुम्ही आम्हाला उत्तर देण्यास बांधील आहात असे देखील महिलेने म्हटले आहे. इतर लोकांनीही या अन्यायकारक निर्णयाविरोधात आवाज उठवला असता तर नक्कीच फरक पडला असता असे देखील महिलेने पत्रात म्हटले आहे. सदरील महिलेने यासंदर्भात फेसबुक वर पत्र आणि पोलिसांना पाठवलेला मेल पोस्ट केला आहे.
हे पण वाचा,
- पटोलेंच्या वक्तव्याने खळबळ; आत्मसन्मान राखण्यासाठी तरी काँग्रेस सत्तेतून बाहेर पडणार का? भाजपचा सवाल
- मोठी बातमी: संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होणार!
- “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महामारी काळात देशात सर्वात उत्तम काम केलं आहे.”
- पंकजा मुंडेंना गमावतीये का भाजप? आणखीन ७७ पदाधिकाऱ्यांनी ठोकला पक्षाला रामराम
- मोदी सरकार लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याच्या तयारीत; ६ ऑगस्टला राज्यसभेत होणार चर्चा!