सातारा: जरंडेश्वर साखर कारखाना हा शेतकरी हिताचा निर्णय घेणारा महाराष्ट्रातील एकमेव प्रगत साखर कारखाना ठरलेला आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेल्या या कारखान्यावर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने ईडीमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जरंडेश्वर कारखाना चालू राहिला तर जिल्ह्यातील ५० हजार शेतकऱ्यांना न्याय मिळणार आहे. कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी अजिबात शांत बसणार नाही आणि ईडीने राजकीय हेतूने जर कारखाना बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ईडीला सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ताकद दाखवून देऊ असा आव्हानात्मक इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
हे पण वाचा, जरंडेश्वर कारखाना: १४ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाची नोंद अन् शेतकरी आणि ऊस पुरवठादार चिंतेत
हे पण वाचा, उभारणीपासून ते आतापर्यंत चर्चेत असणाऱ्या जरंडेश्वर साखर कारखान्याची ‘१८ वर्षांची’ अशी आहे लढाई
महाराष्ट्र राज्य सहकार बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे यांच्या सातारा जिल्ह्यात स्थित असणाऱ्या जरंडेश्वर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे. जरंडेश्वर साखर कारखाना पूर्वी साखर कारखाना होता. मात्र अडचणीच्या काळात महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज त्यांच्याकडून घेण्यात आलं होतं. मात्र महाराष्ट्र सहकारी बँकेचं कर्ज फेडू न शकल्याने जरंडेश्वर कारखान्याचा लिलाव करण्यात आलेला होता. त्यानंतर कारखाना खासगीरित्या विकत घेतला होता आणि ईडीच्या कारवाईच्या भोवऱ्यात हा कारखाना सापडलेला आहे.
हे पण वाचा, बंटी पाटलांनी शब्द पाळला; गोकुळ कडून दूध उत्पादकांच्या दुधासाठी २ रुपये दरवाढ जाहीर
हे पण वाचा, जरंडेश्वर साखर कारखाना ईडीकडून जप्त, कारवाई नेमकी कुणावर? अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
आमदार शिंदे म्हणाले की जरंडेश्वर कारखाना २०१० सालापर्यंत २५०० मेट्रिक टन क्षमतेचा होता आणि आज कारखाना १० हजार मेट्रिक टन क्षमतेपेक्षा चालत असून वीज निर्मितीसह डिस्टलरीची उभारणी देखील केली जात आहे. आज जरंडेश्वर कारखान्याच्या माध्यमातून हजारो रोजगार तयार झालेले आहेत आणि ५० हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ होत आहे. केवळ सातारा जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात उच्चांकी दर देणारा आणि वेळेवर ऊसउत्पादक शेतकऱ्यांची बिले देणारा कारखाना असल्याने शेतकरी देखील जरंडेश्वर ऊस घालत आहेत. मात्र जर सरकारी यंत्रणेचा वापर करून जरंडेश्वर ला संपवण्याचा कोणी प्रयत्न केला तर आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा ईडीला शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.
हे पण वाचा,
‘चंद्रकांत पाटलांना मस्ती आलीये’ – हसन मुश्रीफ
“चंद्रकांत दादा तुम्ही सगळी माया कुठं लपवून ठेवली आहे हे मला चांगलं माहित आहे”; हसन मुश्रीफ
“वेळ आली तर हसन मुश्रीफांना मलाच विकून पैसे वसूल करावे लागतील”