नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे गडमंदिर शोभायात्रेत सामील झाल्याने एका दलित युवकाची हत्या होते. मारहाणीत मुस्लीम तरूण जखमी होतो. हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. ‘तुम्ही महार आणि मुस्लीम असूनही येथे कशाला आले?’ अस म्हणून केवळ गडमंदिर शोभायात्रेत सामिल झाला म्हणून मारहाण केल्याचे पीडिताच्या वडिलांनी पोलीस जबाबात सांगितले आहे. ही घटना महाराष्ट्राच्या अस्मितेला काळिमा फासणारी आहे. असं म्हणत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या घटनेवरून यालाच रामराज्य म्हणायचे काय? असा संतापजनक सवाल केला आहे.
हेही वाचा…ललित पाटील कुणाला हप्ते देत होता? 40 पोलिस, काही नेते, सुषमा अंधारेंच्या हाती लागलं ‘ते’ पत्र
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे. थोर संतांची, समाजसुधारकांची शिकवण महाराष्ट्राला मिळाली आहे. तरीही अशा घटना वारंवार घडत आहेत हे दुर्दैवी आहे. यापूर्वी बीड येथील पारधी समाजाच्या महिलेला विवस्त्र करून मारहाण केली गेली. शेळी आणि कबुतर चोरल्याच्या संशयावरून श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथे तीन दलित तरुणांना झाडाला बांधून मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली होती. अशा एकामागून एक घटना घडत असताना सरकार मात्र गप्प आहे. असा हल्लाबोलही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा…“जाती जातीत भांडण करणाऱ्या नेत्यांमध्येच भांडणं, तीन पक्षांचा तमाशा”, यशोमती ठाकूर यांनी डिवचलं
दरम्यान, अशा घडना घडू नयेत म्हणून सरकारकडून कोणतेही प्रयत्न केले जात नाहीत. समाजकंटकांना कायमची अद्दल घडविण्याचा दम सरकारमध्ये नाही. म्हणून अशा घटनेत वाढ होताना दिसत आहे. सत्तेत असलेल्यांनी जी जातीय विषाची पेरणी केली त्यातून हे सगळ उगवल आहे.असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! ललित पाटील प्रकरणाबाबत ससून रूग्णालयातील कर्मचाऱ्यांवर चौकशीचा बडगा
हेही वाचा…अद्वय हिरेंनंतर बंधू अपुर्व हिरेंच्याही विरोधात गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…वाद पेटला..! ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवींच्या गाडीची तोडफोड, शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक
हेही वाचा…रविकांत तुपकरांसमोर राज्य सरकार झुकलं, ७० ते ८० टक्के मागण्या मान्य, १५ दिवसांची दिली मुदत
हेही वाचा…“मराठ्यांना कुणबीचा दाखला देण्यावाचून आता देशातील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही”