मुंबई : राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरीत काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यक्तीत करण्याची इच्छा राज्यपाल भगतिसंह कोश्यारी यांनी काल व्यक्त केली आहे. त्यांना यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र देखील लिहिलं आहे. तसेच पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशीर्वाद मिळत राहिलं असं राज्यपालांनी म्हटलं आहे. त्यावर घटनातज्ज्ञ उल्लास बापट यांनी याबाबत भाष्य केलं आहे.
“शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
उल्लास बापट म्हणाले की, घटनेच्या तरतुदी ह्या स्वच्छ आहेत. भारतीय संविधानानुसार 155 कलमाखाली राष्ट्रपती राज्यपालांची नेमणुक करीत असतो. तसेच 156 कलमानुसार राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावर राहतात. तसेच त्याचवेळी त्यांना कोणत्याही क्षणी काढता देखील येतं. यामध्ये राज्यपाल आपला राजीनामा देऊ शकतात. पंरतु पुढचे राज्यपाल येईपर्यंत ते आपल्या पदावर राहतात ह्या घटनेच्या तरतुदी आहेत.
मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?
भारतात लोकशाही पद्धत असल्याने पंतप्रधानाची मर्जी असे पर्यंत राष्ट्रपतीही पदावर असतात. तसेच त्यांचावर राज्यपालाचाही समावेश असतो. त्यामुळेच भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे. त्यामुळे पंतप्रधान राष्ट्रपतीला सांगू शकतात की, यांना राज्यपाल पदापासून पदमुक्त करावं. पंरतु त्याच्यामध्ये थोडा अपमान असतो. त्यामुळे अगोदर त्यांचा राजीनामा मागवून घेतात अन् तो दिल्यावर तो स्विकारतात, असंही त्यांनी म्हटलं.
“माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, देशात कुठलाही राजकीय निर्णय हा पंतप्रधान घेतात. तसेच आपले पंतप्रधान हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपेक्षा जास्त ताकदवान आहेत. त्यामुळे पंतप्रधान कधीही निर्णय घेऊन राज्यपालांना पदमुक्त करतील. असंही त्यांनी म्हटलं आहे.
Read also
- कसबा पोटनिवडणुकीत आघाडीत बिघाडी होणार का? काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनाही आग्रही
- “लोकांसाठी आंदोलने केलीत, विकासाचं मॉडेलं दिलं, पण आम्हाला तुम्ही काय दिलं…!” राज ठाकरे
- शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं
- इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?
- काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक