मुंबई : जोपर्यंत मुंबई-पुण्याच्या बाहेरच्या महाराष्ट्राच्या विकास होणार नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. पुणे-मुंबईचा विस्तार कुठवर होतोय हेच कळत नाही. शहरात येणाऱ्या लोंढ्यांचा विचार केला जात नाही तो पर्यंत व्हिजनच्या सगळ्या चर्चा पोकळ आहेत. आपण मूळ प्रश्नांना कधी हात घालणार. फक्त मेट्रो बांधून किंवा फ्लायओव्हर बांधून ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार नाही. आज पार्किंगचा प्रश्न गंभीर आहे. गाड्यांचं रजिस्ट्रेशन करताना आपण विचार करत नाही की ह्याला पार्किंग मिळणार का? अशा प्रश्नांचा विचार कधी करणार. आज पण मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, ते का सुटले नाहीत ह्याचा विचार आणि चर्चा व्हायला हवी, ती जो पर्यंत होत नाही तो पर्यंत ‘व्हिजन’च्या चर्चानी काय साध्य होणार? असा सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. ते एबीपी माझाच्या कार्यक्रमात बोलत होते.
“माझं आजही गद्दारांना आवाहन आहे की, त्यांनी निवडणुका घ्याव्यात”, ठाकरेंनी बंडखोरांना डिवचलं
पुढे बोलतांना ते म्हणाले की, ज्या पक्षाने लोकांसाठी असंख्य आंदोलने केली, राज्याचा विकास आराखडा सादर केला, विकासाचं मॉडेल राबवून दाखवलं. तरीही जेव्हा त्यांचं प्रतिबिंब मतदानात उमटत नाही, तेव्हा वाईट वाटतं. पण हरकत नाही, लोकं आम्हाला संधी देतील, तेव्हा आमची व्हिजन महाराष्ट्रात राबवू. पक्ष स्थापनेच्या वेळी जे भाषण मी केलं. त्यावेळी मी महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यूप्रिंट आणणार असं सांगितलं. जी मी 2014 ला महाराष्ट्रात सादर केली.
पण आजपर्यंत एकाही पत्रकारांनी ही ब्ल्युपिंट वाचून माझ्याशी चर्चा केली नाही, किंवा त्याबाबत कोणतीच चर्चा नाही. असं का ? आज राजकारण्यांकडून व्हिजन घेण्याची नाही तर त्यांना बसवून तज्ज्ञांकडून व्हिजन देण्याची गरज आहे. ह्यासाठी माझ्यासकट सगळ्या राजकारण्यांना बसावा. तज्ज्ञांकडून आम्हाला प्रेझेंटेशन द्या आणि मग त्या कल्पना आम्ही कधी पुर्ण करणार हे विचारा, असंही राज ठाकरे यांनी सांगितलं.
Read also
- शिवसेना-वंचित युती, पोटनिवडणुका, मुंबई पालिका निवडणुक, राज्यपाल, राष्ट्रवादीने स्पष्टचं केलं
- इच्छुक आमदारांचे डोळे दिल्लीच्या दिशेने, शिंदे-फडणवीस आजच दिल्लीहून मंत्रिमंडळाची यादी आणणार?
- काॅंग्रेसचा मास्टर प्लॅन तयार, मनसे, शिवसेनाही तयार, पोटनिवडणुकांबाबत राष्ट्रावादीची बैठक
- “शिवशक्ती अन् भीशक्तीचा फारसा काही परिणाम होणार नाही”; युतीबाबत फडणवीसांची प्रतिक्रिया
- मोदींचा मुंबई दौरा…! अन् शिंदे गटाच्या खासदारांचं नशीब बदललं, केंद्रात संधी…?