मुंबई : राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबईत, एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी, “भारतासारख्या मोठ्या देशात लसीकरणची मोहीम राबवणे हे कठिण होतं. आज आपण देशात चार लसी तयार केल्या आहेत. मात्र, त्या केल्या नसत्या, तर अमेरिका, ब्रिटनने “आधी आम्ही लसीकरण करतो, नंतर तुम्हाला लस देऊ” असं आपल्याला सांगितलं असतं आणि देश परमनंट लॉकडाऊनमध्ये अडकला असता,” असं म्हणत केंद्र सरकारचे कौतुक केलं आहे.
“थांबा, दिवाळीनंतर आमचेच सरकार राज्यात येईल” रोहित पवारांच्या मतदारसंघात सुजय विखेंना गुदगुल्या
तसेच, “महामारीशी सर्वच संघर्ष करत आहोत. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाला आहे. मात्र, केंद्र सरकारकडून आर्थिक पॅकेज दिले गेले असल्याने त्याची झळ जरा कमी झाली आहे,” असं मत मांडलं. “लसीकरणावरून नागरिकांच्या मनामध्ये संभ्रम आहे. तो दूर करणे गरजेचे आहे. लस घेतल्याने मृत्यू होतो, नपुसंकत्व येतं, असे चुकीचे संभ्रम निर्माण करण्यात आले आहेत. मात्र, आता देशातली बाधित रुग्नांची संख्या कमी होते आहे. त्यामुळे, लसीचा प्रभाव लोकांच्या लक्षात आला आहे,” असं ते म्हणाले.
राणे-सेना वादानंतर राऊतांच्या सुरक्षेत वाढ, घर आणि कार्यालयाला छावणीचं स्वरूप!
यावेळी, माथाडी कामगारांविषयी भाष्य करताना, “माथाडी कामगार अतिशय कठिण परिस्थितीत काम करतो. त्यांच्या लसीकरणाला प्राधान्य दिलं पाहिजे. त्यासाठी नरेंद्र पाटलांनी चांगला प्रयत्न केला असून, एनजीओच्या माध्यमातून मी स्वत: कामगारांच्या लसीकरणासाठी १० हजार लसी देणार आहे. माथाडी चळवळ किती महत्त्वाची आहे, याचं महत्त्व मला त्यांनी पटवून दिलं आहे. त्यामुळे २३ सप्टेंबरला केंद्रीय कामगार मंत्र्यांना मुंबईत आणण्यासाठी मी १००% टक्के प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Read Also :
- “…तर ५ सप्टेंबरला जलसमाधी घेऊ,” राजू शेट्टींचा ठाकरे सरकारला इशारा; पंचगंगा परिक्रमा सुरू
- मनसे अध्यक्षांनी घेतली सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळेंची भेट, दिली पहिली प्रतिक्रिया
- मविआ नेते राज्यपालांना भेटणार? १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न सुटण्याची शक्यता!
- अशोक चव्हाणांच्या घरावर दगडफेक, बंगल्याचं मोठं नुकसान, काय घडलं?…
- पीएमआरडीएच्या आराखड्याविरोधात माजी राज्यमंत्री संजय भेगडे मैदानात