मुंबई : मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं, ते सोडलं त्यांचे म्हणणं आहे पण हे सगळे ढोंग आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो आता राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत. त्यापुर्वी २०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती. तेव्हा या महाशयांनी भाजपबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळचे तथाकथित मंत्री होते. असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला. खासदार संजय राऊत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मुलाखत घेतली त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…“खेकड्यांना सांभाळलं असतं तर…” उद्धव ठाकरेंच्या टिकेवर गुलाबराव पाटलांचं जोरदार प्रत्युत्तर
जे आता गेलेत मी न सांगता बडेजाव मारत होते की, आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो. तुम्हाला राजीनामा घेऊन फिरायला कुणी सांगितले? का वेळ आली होती तुमच्यावर? मला आता सुखाचा वीट आलाय, सगळं मिळालंय आणखी काय देणार म्हणून याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असं बोलून जा ना हेच सत्य आहे. असंही ठाकरेंनी म्हटलं आहे.
हेही वाचा…निधीवाटप..! भाजपच्या ‘या’ आमदाराला सर्वाधिक, जयंत पाटलांना ५८० कोटी ३१ लाख, काॅंग्रेसच्या १५ आमदाराला एकही रूपया नाही
दरम्यान, बंगळुरूच्या बैठकीत मला खरचं आश्चर्य वाटलं. राहुल गांधींना यापुर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज गैरसमज जास्त होते. ते हिंदुद्वेष्टे आहेत, ते असे आहे. ते तसे आहेत. पण प्रत्यक्ष भेटल्यांतर मला असं वाटलं की राहुल गांधी समजून घेताहेत, ऐकताहेत, त्यांना जे काही वाटतंय हे हळूवारपणे बोलताहेत. नुसतं ऐकून घेत नाहीत तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांसमोर मांडतात सुद्धा असंही ठाकरे यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…शिवसेनासारखी राष्ट्रवादीचीही राजकीय लढाई सुरू झाली, शरद पवार गटाला आयोगाची नोटीस
हेही वाचा…“मिठी नदीत विझवून सोनिया गांधींच्या सेनेसमोर..,”बावनकुळेंची ठाकरेंवर जहरी टिका
हेही वाचा…ठाकरेंना मोठा झटका…! तब्बल सात वेळा राहिलेल्या ‘या’ नगरसेविकानी शिंदे गटात केला प्रवेश
हेही वाचा…“२०२४ मध्ये मोदी जेव्हा पंतप्रधानपदाची शपथ घेतील, त्यावेळी आमचे ४५ पेक्षा जास्त खासदार असतील”,- बावनकुळे
हेही वाचा…“शिरीष कणेकरांच्या दु : खद निधनाची बातमी पचविणे अवघड”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे