मुंबई : मुंबईतील धारावी विकास पुनर्विकास प्रकल्पावरून कॉंग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांनी राज्य सरकार गंभीर आरोप केले आहेत. धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मोदींनी विकास मेगास्कॅमचा मोठा आणि स्कम असल्याचा वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. तसेच १ लाख कोटी अधिक नफा असलेल्या टीडीआर मध्ये धारावीच्या विकासयोग्य क्षेत्राच्या सहा ते सात पट पर्यंत वाढवल्या आहेत. तसेच एकूण विक्रीयोग्य बिल्ट अर जागेपैकी १०.५ कोटी चौरस फुट अशी आकडेवारी फुगवून सांगितले असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे. त्यावर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी उत्तर दिले आहे.
हेही वाचा…राजीनामा दिल्यानंतर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाणांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले….
आशियातील सर्वोत मोठ्या रिअल इस्टेट घोटाळ्यासंदर्भात नागरी जमीन बळकावण्याबाबत महाराष्ट्र विधानसभेत बोलत असतांना याची आकडेवारी मांडली होती. ज्यामध्ये अदानी ग्रुपला केवळ मोठा धक्काच नाही तर विकासाच्या नावाखाली धारावीकरांचे हक्क कसे लुटले जात आहेत. हे देखील उघड झाले असल्याचे म्हटले आहे. धारावीकरांच्या किंमतीवर अदानीला फायदा मिळवून देण्यासाठी सर्व नियम आणि न्याय पद्धतींकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. जेव्हा संपुर्ण धारावीचा चार ते पाच एफएसआय देऊन पुनर्विकास होऊ शकतो. तेव्हा अदानी सात लाख लोकांना विस्थापित करून धारावीकरांना एका कोपऱ्यात दाबून १०.६२ एफएसआय/ टीडीआर का मिळते. असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात सध्या कॉंग्रेस पक्षाचा हिरो, मला कशाचीच भीती नाय,” कॉंग्रेसच्या ‘या’ आमदारांचं मोठं विधान
दरम्यान, वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर मंगलप्रभात लोढा यांनी उत्तर दिले आहे. ही श्रेय वादाची लढाई नाही. परंतु ओपन स्पेस पॉलिसीबाबत महापालिका आयुक्तांना डिसेंबर २०२३ मध्ये मी लिहिलेले हे पत्र तुम्ही वाचावे असं म्हटलं आहे. तसेच त्यात नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आदेश यापुर्वीच दिले असतांना कॉंग्रेसने श्रेय कसे ? मुंबईकरांच्या प्रश्नांना प्राधान्य देतांना त्यांच्या सेवेसाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळे हे जनतेचे श्रेय असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मा. @VarshaEGaikwad ताई
ही श्रेय वादाची लढाई नाही!
परंतु तुम्हाला सांगू इच्छितो,
ओपन स्पेस पॉलिसीबाबत महापालिका आयुक्तांना डिसेंबर 2023 मध्ये मी लिहिलेले हे पत्र तुम्ही वाचावे!त्यात नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आदेश मी यापूर्वीच दिले असताना, हे काँग्रेसचे श्रेय कसे?… https://t.co/jlPT5Kl7og pic.twitter.com/rvgfJgJ6y3
— Mangal Prabhat Lodha (@MPLodha) February 12, 2024
READ ALSO :
हेही वाचा…अशोक चव्हाणांचा राजीनामा..! परंतु कॉंग्रेसने ‘या’ निवडणुकीत भाजपला पाणी पाजलं, एकच चर्चा
हेही वाचा…“भाजपाला आता कुत्रासुद्धा मत देणार नाही , कारण..,” उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“आगे आगे देखो होता है क्या..” फडणवीसांच्या विधानानंतर भाजप नेत्यांची धाकधुक वाढली, कुणाचं तिकीट, तर कोणाची खरकटी…?
हेही वाचा…कॉंग्रेसमधून राजीनामा का दिला ? अशोक चव्हाणांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले….
अशोक चव्हाणांचा कॉंग्रेस पक्षाला राम राम, नाना पटोलेंनी कॉंग्रेसच्या इतर नेत्यांनाही दिला ‘हा’ इशारा