मुंबई : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने दहीहंडी मंडळं, गोविंदा पथकांच्या समन्वय समितीसोबत घेतलेल्या बैठकीनंतर दहीहंडीच्या आयोजनाला परवानगी नाकारली आहे. या बैठकीमध्ये समन्वय समितीने आपली बाजू मांडली आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच टास्क फोर्सने या आयोजनाचे काय परिणाम होतील हे सविस्तर सांगितल्यानंतर समन्वय समितीला राज्य सरकारची भूमिका पटल्याने त्यांनी हा निर्णय स्वीकारल्याचं पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केलं आहे. मात्र असं असलं तरी भाजपाचे आमदार राम कदम आणि आशिष शेलार यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. काहीही झालं तर हिंदू दहीहंडी साजरी करणारच, गेल्या वर्षीप्रमाणे यंदा राज्य सरकारला गोविंदाची घागर उलटी करू देणार नाही, असं थेट आव्हान राज्य सरकारला दिलं आहे.
“… तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे मागू ,” भाई जगतापांचा नितीन राऊतांना इशारा
राम कदम म्हणाले, “आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच. हा हिंदूंचा उत्सव आहे. जेव्हा हिंदूंचे उत्सव येतात तेव्हा आम्हाला सबुरीचे सल्ले. मात्र इतरांचे उत्सव येतात तेव्हा त्यांना परवानगी दिली जाते, हा दुटप्पी न्याय कसा?” असा प्रश्न राम कदम यांनी उपस्थित केला आहे. “बियर बार, दारुचे ठेले सुरु करता. त्यांच्यासाठी नियम बनवता. तसे नियम बनवणार असाल तर त्या नियमांचं स्वागत करु, नियमांचं पालन करु. पण तुम्ही नियम बनवणार नसाल आणि एअर कंडिशन बंगल्यामधून सांगणार असाल की दहीहंडी साजरी करायची नाही तर हिंदू बांधव ऐकणार नाही. आम्ही दहीहंडी साजरी करणार म्हणजे करणारच,” असंही राम कदम म्हणाले आहेत.
‘या’ महिन्यात राज्यात येणार सर्वात धोकादायक तिसरी लाट, राजेश टोपे म्हणाले…
आशिष शेलार म्हणाले, दहीहंडी उत्सव कोरोनाच्या कारणामुळे करू नका अशी सरकारची भूमिका आहे. मात्र मी स्वतः मुख्यमंत्र्यांना पहिल्यांदा दहीहंडीच्या विनवणी साठीच फोन केला आहे. दोन डोस झालेल्या आणि प्रमाणपत्र असलेल्या जास्त उंच नसलेला असा पारंपारिक पद्धतीने दहीहंडी उत्सव आम्हाला करू द्या, अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडलेली आहे. पारंपारिक कमी गर्दीच्या, कमी उंचीच्या दहीहंडीला परवानगी दिली पाहिजे जर नाही दिली तर सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचंही यावेळी आशिष शेलार माध्यमांशी बोलताना सांगितलं.
म्हाडाचे मंत्री तळियेत फिरकलेच नाहीत! शिवसेना आमदाराचे आव्हाडांना खडेबोल
दरम्यान, “जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा,” असे सांगत दहीहंडीवर याही वर्षी निर्बंध असतील असे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. तसेच, दहीहंडीऐवजी सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी गोविंदा पथकांना केले आहे. यावरून आता भाजप आमदार आक्रमक झाले आहेत. त्यामुळे, ठाकरे सरकार विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also :
- “सण -वार, उत्सव बाजूला ठेऊन कोरोनाला हद्दपार करू,” मुख्यमंत्र्यांचे गोविंदा पथकांना आवाहन
- “पारनेरच्या तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो…”, अण्णा हजारेंचा ज्योती देवरेंना सल्ला
- “१२ कोटी जनतेला विचारा उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?” बावनकुळेंचे ठाकरे सरकारला आव्हान
- देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई
- महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस