मुंबई : गोवा विधानसभा निवडणुकीत सध्या गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. उत्पल पर्रिकर यांना तिकीट देण्यावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. उत्पल पर्रिकर यांनी तर विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पणजीतून तिकीट न दिल्यास कठीण निर्णय घ्यावा लागेल, असा इशाराही दिला आहे.
मेट्रोची पाहणी करायला शहरात शरद पवार आले, महापौरांना नाही बोलवले
दरम्यान, दुसरीकडे शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत उत्पल पर्रिकर यांना सतत पाठिंबा दर्शवत असून पुन्हा एकदा भाजपावर टीका केली आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “मनोहर पर्रिकरांचा मुलगा इकडे तिकडे फिरत असून त्याला अपमानित केलं जात आहे. त्याची औकात काढली जात आहे. मग तिकीट देण्याची चर्चा कधीपासून सुरु झाली. उत्पल पर्रिकर अपक्ष उभे राहिल्यास आम्ही सर्व त्यांना पाठिंबा देऊ असं आम्ही सांगितल्यानंतर भाजपाची धावपळ सुरु झाली आहे. त्यांना तिकीट द्यावंच लागेल”.
“मी कोणतंही राजकीय भाष्य करत नाही. पण मनोहर पर्रीकर गोव्यातील प्रमुख नेते होते. गोव्याच्या विकासात त्यांचं योगदान आहे. आज गोव्यात जी भाजपा दिसत आहे त्यात मनोहर पर्रिकर यांचंच योगदान आहे. आजही गोव्यात भाजपा त्यांच्या नावाने ओळखली जाते आणि त्यांच्याच मुलाची औकात काढली जात आहे. गोव्यात, राजकारणात पर्रिकरांनी ज्यांना मोठं केलं तेच त्यांच्या मुलाची औकात काढत आहेत हे चांगलं वाटलं नाही,” असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.
मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे आक्षेपार्ह वक्तव्य
“त्यांना तिकीट देणं, न देणं ही पुढील गोष्ट आहे. पण उत्पल पर्रिकर यांच्या जागी माफियाला तिकीट दिलं जात आहे. उत्पल पर्रिकर यांचं ट्वीट मी पाहिलं आहे. तिथे कोणाला तिकीट देत आहात त्यावर चर्चा करा, त्यानंतर पाहू,” असंही संजय राऊतांनी सांगितलं.
Read also:
- नानाभाऊंनी, राजीनामा देवून पुण्याच्या येरवड्यात दाखल व्हावं; महापौर मुरलीधर मोहोळांचा सल्ला
- पंतप्रधान मोदींबद्दल नाही तर एका गावगुंड मोदीबाबत बोललो; नाना पटोलेंचा यु-टर्न
- हिंमत असेल तर गोव्यातून निवडणूक लढवा; चंद्रकांत पाटलांचे राऊतांना खुले आव्हान
- नाना पटोलेंची भाषा आक्षेपार्ह, त्यांना तात्काळ अटक करा; नितीन गडकरी, नारायण राणे आक्रमक
- काँग्रेस हा लोकशाहीतील राजकीय पक्ष की दहशत पसरविणारे संघटन? पटोलेंच्या वक्तव्यावर फडणवीसांचा संताप